नाशिक:
कसारा घाटात बुधवारी रात्री गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरल्याने मुंबई-नाशिक रेल्वे विस्कळीत झाली आहे. या अपघातात चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने सगळे प्रवासी बचावले आहेत. दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सध्या मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईहून निघालेली गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस इगतपुरी कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात आली. एक्सप्रेस पुलावर येताच इंजिनामागील डबा रुळावरून घसरला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडी वेळीच थांबवली गेली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
कसारा घाटात बुधवारी रात्री गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरल्याने मुंबई-नाशिक रेल्वे विस्कळीत झाली आहे. या अपघातात चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने सगळे प्रवासी बचावले आहेत. दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सध्या मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईहून निघालेली गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस इगतपुरी कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात आली. एक्सप्रेस पुलावर येताच इंजिनामागील डबा रुळावरून घसरला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडी वेळीच थांबवली गेली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.