अ‍ॅपशहर

हक्काच्या पैशांसाठी पोलिसांना साकडे

पॅनकार्ड क्लब्ज् कंपनी लिमिटेड या खासगी कंपनीत गुंतवलेली रक्कम मुदतपूर्तीनंतरही मिळत नसल्याने नागरिक संघर्ष समितीने बुधवारी मोर्चा काढून पंचवटी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Maharashtra Times 27 Apr 2017, 3:46 am
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pancard clubs investor andolan
हक्काच्या पैशांसाठी पोलिसांना साकडे


पॅनकार्ड क्लब्ज् कंपनी लिमिटेड या खासगी कंपनीत गुंतवलेली रक्कम मुदतपूर्तीनंतरही मिळत नसल्याने नागरिक संघर्ष समितीने बुधवारी मोर्चा काढून पंचवटी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या कंपनीचे कार्यालय पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

पॅनकार्ड क्लब्ज् कंपनीचे निमाणी बस स्थानकासमोर सूर्या आर्किड इमारतीमधील तिसरा मजला शाखा कार्यालय होते. कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील जनतेला वेगवेगळ्या स्किम सांगून या कंपनीने डोलारा उभा केला. गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात रकमा जमा केल्या आहेत. कंपनीच्या भूलथापांना बळी पडून दोन हजार २५७ नागरिकांनी वीस कोटी रुपयांची रक्कम दहा वर्षात कंपनीकडे जमा केली आहे. हा आकडा नाशिकचा आहे. जिल्ह्यातील उपलब्ध नाही. मात्र, सदर रक्कम कंपनी संचालकांनी नाशिक जिल्ह्याच्या बाहेर म्हणजेच गोवा, पुणे, पनवेल, शिर्डी, तसेच परराज्यात केरळ, राजस्थान, आंध्र प्रदेश दिल्ली, ओडिसा आदी ठिकाणी स्वतःचे प्रकल्प उभे केले. मात्र आज रोजी गुंतवणुकदारांना त्यांच्या परताव्याची रक्कम परत देण्यासाठी वेळ काढूपणाची धोरण स्वीकारून रक्कम बुडत करण्याच्या मार्गावर आहे.

रक्कम स्वीकारताना कंपनीने दीड पट रक्कम परत करण्याचे अमिष दाखविले होते. मात्र, मुदत संपूनही गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम देण्यास तीन वर्षांपासून टाळाटाळ केली जात आहे. नाशिकचे हे कार्यालय दोन महिन्यांपासून बंद आहे. अनेक नागरिकांनी मुंबईच्या कार्यालयाशी संपर्क साधून विनंती करीत रक्कमेची मागणी केली आहे. त्यांना अनेक कारणे सांगून टाळाटाळ केली जात असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.

गुंतवणूकदारांचे धनादेश वटलेच नाहीत

काही नागरिकांकडून एक वर्षापूर्वी बँकेचे खातेनंबर घेऊन नेफ्टी व ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, एकाही गुंतवणूकदाराला पैसे मिळालेले नाही. तसेच काही नागरिकांना चेक दिले होते ते वटले नाहीत. त्यामुळे या गुंतवणुकदारांसमोर संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक संघर्ष समितीचे गणेश पवार, धनंजय बुचडे, वि. गो. पेंढारकर, बी. टी. इंगळे, काशिनाथ दिंडे, रवींद्र पाटील आदींनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज