औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी मुस्लिमांनी केलेल्या आग्रहामुळेच कॉँग्रेसने शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री व कॉँगेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केल्याने खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात (सीएए) झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, 'आपण, तसे बोललो नसल्याचे स्पष्टीकरण चव्हाण यांनी मंगळवारी 'पीटीआय'कडे दिले आहे. 'मुस्लिमांच्या आग्रहामुळेच काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले. मुस्लिमांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन करीत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले,' असे चव्हाणांचे वक्तव्य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
'मुस्लिमांच्या आग्रहामुळे सरकारमध्ये सहभागी'
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी मुस्लिमांनी केलेल्या आग्रहामुळेच कॉँग्रेसने शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री व ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2020, 4:00 am