अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या; बालकाची सुखरूप सुटका
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हात उसने दिलेले ४० हजार रुपये मिळत नसल्याने एकाने सदर कुटुंबातील दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अपहरणकर्त्याचा कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी त्यास जेरबंद करीत अपहृत मुलाची सुटका केली. किशोर बाळासाहेब गोडसे, असे संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे.
संशयित गोडसे याचे जेलरोड परिसरातील एमएसईबी कॉलनी येथे राहणाऱ्या फिर्यादी सतीश रमेश विद्वांस यांच्याशी ओळखीचे संबंध होते. यातूनच २०१३ मध्ये संशयित गोडसेने विद्वांस यांच्या विवाहासाठी ४० हजार रुपयांची मदत केली. पैसे येतील तसेच विद्वांस यांनी ते द्यावे, असे या दोघांमध्ये ठरले. मागील तीन महिन्यांपासून गोडसे रात्री अपरात्री विद्वांस यांच्या घरी येऊन पैशांची मागणी करू लागला. विद्वांस यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी असमर्थता दर्शवली. २१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोडसेने विद्वांस यांचे घर गाठले. यावेळी विद्वांस यांची पत्नी दीड वर्षाच्या अथर्वला घराबाहेर खेळवत होती. संशयिताने अथर्वलला आपल्या सोबत घेत मुलास चॉकलेट आणून देतो, असे सांगत तेथून काढता पाय घेतला. यानंतर अथर्व व गोडसे परत आलेच नाहीत. विद्वांस दाम्पत्याने नाशिकरोड बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन तसेच गोडसे काम करतो या ठिकाणी शोध घेतला. अथर्वचा कुठेच पत्ता लागत नसल्याने अखेर विद्वांस दाम्पत्याने उपनगर पोलिस स्टेशन गाठले. दुर्दैवाने विद्वांस यांच्याकडे गोडसेचा पूर्ण पत्ता, फोन नंबर नव्हता.
इतकेच नव्हे, तर त्यांच्याकडे अथर्वचा देखील फोटोग्राफ नव्हता. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू होताच थंडावला. तरीही पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. २३ ऑक्टोबर म्हणजे रविवारी आरोपीने विद्वांस यांना मोबाइलवर कॉल करून ६५ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. पैसे दिले नाही, तर अथर्वला परत भेटणार नाही, असा दम त्याने दिला. यानंतर विद्वांस यांनी लागलीच ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी सदर मोबाइल क्रमांक
गंगापूररोडवरील एका दुकानात काम करणाऱ्या मुलाचा असल्याचे शोधून काढले. मात्र, गोडसेने आपल्याच मोबाइलवरून कॉल केला आणि त्याच्याकडे एका लहान मुलगा होता, एवढीच माहिती त्याने दिली.
माहितीनुसार, नाशिकरोड, पंचवटी, गंगापूररोड आदी ठिकाणी सापळा रचला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सीबीएस बसस्थानकाबाहेरील कोपऱ्याच्या अंधारात गोडसे अर्थवासहीत मिळून आला. पोलिसांनी लागलीच त्याला जेरबंद केले. सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान पोलिस आयुक्तांनी अथर्वला त्याच्या पालकांकडे सपूर्द केले.
शहरात अपहरणाच्या घटना सातत्याने घडतात. या केसमध्ये सर्वांनीच सततचा पाठपुरावा करून संशयितास जेरबंद केले. १८ वर्षापर्यंतच्या मुलांच्या अपहरणाचे गुन्हेदेखील दाखल होतात. यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सोसायटी भागात सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे.
- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हात उसने दिलेले ४० हजार रुपये मिळत नसल्याने एकाने सदर कुटुंबातील दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अपहरणकर्त्याचा कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी त्यास जेरबंद करीत अपहृत मुलाची सुटका केली. किशोर बाळासाहेब गोडसे, असे संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे.
संशयित गोडसे याचे जेलरोड परिसरातील एमएसईबी कॉलनी येथे राहणाऱ्या फिर्यादी सतीश रमेश विद्वांस यांच्याशी ओळखीचे संबंध होते. यातूनच २०१३ मध्ये संशयित गोडसेने विद्वांस यांच्या विवाहासाठी ४० हजार रुपयांची मदत केली. पैसे येतील तसेच विद्वांस यांनी ते द्यावे, असे या दोघांमध्ये ठरले. मागील तीन महिन्यांपासून गोडसे रात्री अपरात्री विद्वांस यांच्या घरी येऊन पैशांची मागणी करू लागला. विद्वांस यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी असमर्थता दर्शवली. २१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोडसेने विद्वांस यांचे घर गाठले. यावेळी विद्वांस यांची पत्नी दीड वर्षाच्या अथर्वला घराबाहेर खेळवत होती. संशयिताने अथर्वलला आपल्या सोबत घेत मुलास चॉकलेट आणून देतो, असे सांगत तेथून काढता पाय घेतला. यानंतर अथर्व व गोडसे परत आलेच नाहीत. विद्वांस दाम्पत्याने नाशिकरोड बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन तसेच गोडसे काम करतो या ठिकाणी शोध घेतला. अथर्वचा कुठेच पत्ता लागत नसल्याने अखेर विद्वांस दाम्पत्याने उपनगर पोलिस स्टेशन गाठले. दुर्दैवाने विद्वांस यांच्याकडे गोडसेचा पूर्ण पत्ता, फोन नंबर नव्हता.
इतकेच नव्हे, तर त्यांच्याकडे अथर्वचा देखील फोटोग्राफ नव्हता. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू होताच थंडावला. तरीही पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. २३ ऑक्टोबर म्हणजे रविवारी आरोपीने विद्वांस यांना मोबाइलवर कॉल करून ६५ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. पैसे दिले नाही, तर अथर्वला परत भेटणार नाही, असा दम त्याने दिला. यानंतर विद्वांस यांनी लागलीच ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी सदर मोबाइल क्रमांक
गंगापूररोडवरील एका दुकानात काम करणाऱ्या मुलाचा असल्याचे शोधून काढले. मात्र, गोडसेने आपल्याच मोबाइलवरून कॉल केला आणि त्याच्याकडे एका लहान मुलगा होता, एवढीच माहिती त्याने दिली.
माहितीनुसार, नाशिकरोड, पंचवटी, गंगापूररोड आदी ठिकाणी सापळा रचला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सीबीएस बसस्थानकाबाहेरील कोपऱ्याच्या अंधारात गोडसे अर्थवासहीत मिळून आला. पोलिसांनी लागलीच त्याला जेरबंद केले. सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान पोलिस आयुक्तांनी अथर्वला त्याच्या पालकांकडे सपूर्द केले.
शहरात अपहरणाच्या घटना सातत्याने घडतात. या केसमध्ये सर्वांनीच सततचा पाठपुरावा करून संशयितास जेरबंद केले. १८ वर्षापर्यंतच्या मुलांच्या अपहरणाचे गुन्हेदेखील दाखल होतात. यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सोसायटी भागात सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे.
- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त