म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
अयोध्या येथील राममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर राज्य सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडवले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईत केली.
करोनाबाबतचे सर्व नियम, बंधने पाळून राममंदिर भूमिपूजनाबाबतचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु पोलिस यंत्रणेने काही ठिकाणी दबावतंत्राचा वापर करून आनंदोत्सव होणारच नाही यासाठी प्रयत्न केले, असा आरोप त्यांनी केला. पिंपरी- चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांनी दहा लाख लाडूंचे वाटप करण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी लाडूवाटपास प्रतिबंध केला. अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा आणि झेंडे जप्त केले. इंदापूर, बारामती, सासवड येथे कार्यक्रम होऊच दिले नाहीत. विदर्भात अमरावती, बडनेरा, परतवाडा, पुसद, अकोला येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. 'कार्यक्रम केला तर बघा, गुन्हे दाखल करू', अशी भाषा पोलिसांकडून वापरली गेली, असाही आरोप उपाध्ये यांनी केला.
नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात अंतर राखण्याचे सर्व नियम पाळून आनंदोत्सव साजरा करण्याची विनंती पोलिसांनी नामंजूर केली. काळाराम मंदिर परिसरात सर्वत्र बॅरिकेड्स लावले गेले. अखेर आमदार देवयानी फरांदे यांनी बंदीहुकूम झुगारून रामकुंडावर आरती केली. सिन्नर येथे आरती केल्याबद्दल शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात ३ तास स्थानबद्ध केले गेले. अनेक ठिकाणी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली गेली, असे उपाध्ये यांनी सांगितले.
सरकारचा छुपा हेतू
कराड येथे पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना कार्यक्रम करू दिला नाही. अकलूज येथेही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली गेली. झेंडे, पताका लावण्यास प्रतिबंध केला गेला. हे प्रकार पाहिल्यावर हा आनंदोत्सव साजरा होऊ द्यायचाच नाही, असा सरकारचा छुपा हेतू होता का, अशी शंका येते, असे उपाध्ये यांनी नमूद केले.
अयोध्या येथील राममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर राज्य सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडवले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईत केली.
करोनाबाबतचे सर्व नियम, बंधने पाळून राममंदिर भूमिपूजनाबाबतचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु पोलिस यंत्रणेने काही ठिकाणी दबावतंत्राचा वापर करून आनंदोत्सव होणारच नाही यासाठी प्रयत्न केले, असा आरोप त्यांनी केला. पिंपरी- चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांनी दहा लाख लाडूंचे वाटप करण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी लाडूवाटपास प्रतिबंध केला. अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा आणि झेंडे जप्त केले. इंदापूर, बारामती, सासवड येथे कार्यक्रम होऊच दिले नाहीत. विदर्भात अमरावती, बडनेरा, परतवाडा, पुसद, अकोला येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. 'कार्यक्रम केला तर बघा, गुन्हे दाखल करू', अशी भाषा पोलिसांकडून वापरली गेली, असाही आरोप उपाध्ये यांनी केला.
नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात अंतर राखण्याचे सर्व नियम पाळून आनंदोत्सव साजरा करण्याची विनंती पोलिसांनी नामंजूर केली. काळाराम मंदिर परिसरात सर्वत्र बॅरिकेड्स लावले गेले. अखेर आमदार देवयानी फरांदे यांनी बंदीहुकूम झुगारून रामकुंडावर आरती केली. सिन्नर येथे आरती केल्याबद्दल शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात ३ तास स्थानबद्ध केले गेले. अनेक ठिकाणी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली गेली, असे उपाध्ये यांनी सांगितले.
सरकारचा छुपा हेतू
कराड येथे पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना कार्यक्रम करू दिला नाही. अकलूज येथेही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली गेली. झेंडे, पताका लावण्यास प्रतिबंध केला गेला. हे प्रकार पाहिल्यावर हा आनंदोत्सव साजरा होऊ द्यायचाच नाही, असा सरकारचा छुपा हेतू होता का, अशी शंका येते, असे उपाध्ये यांनी नमूद केले.