अ‍ॅपशहर

‘मराठी माणसाला न्याय मिळालाच नाही’

मराठी माणसांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची निर्मिती होती; परंतु तसे झाले नाही. मराठी माणसाला अद्याप न्याय मिळालाच नाही. त्यामुळे स्वाभिमान पक्ष काढला आहे. या पक्षाच्या मार्केटिंगसाठी मी येथे आलो आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले.

Maharashtra Times 27 Dec 2017, 6:26 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम political party to give justices to marathi people says rane
‘मराठी माणसाला न्याय मिळालाच नाही’


मराठी माणसांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची निर्मिती होती; परंतु तसे झाले नाही. मराठी माणसाला अद्याप न्याय मिळालाच नाही. त्यामुळे स्वाभिमान पक्ष काढला आहे. या पक्षाच्या मार्केटिंगसाठी मी येथे आलो आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले.

रत्नसिंधू मित्र मंडळातर्फे ईदगाह मैदान येथे आयोजित कोकण महोत्सवात ते बोलत होते. गेल्या चार दिवसांपासून हा कोकण महोत्सव सुरू आहे. राणे पुढे म्हणाले, की मी नाशिकमधील कोकणी माणसासाठी येथे आलो. कोकणी माणूस नाशिकमध्ये येऊन व्यवसाय करतो आहे. पैसे कमावतो आहे यात समाधान आहे. परंतु, तिकडे मुंबईत काय चालले आहे. आज सर्वचजण म्हणतात की मुंबई मराठी माणसाची आहे. परंतु तरूणांनो, विचार करा मुंबईच्या आर्थिक उलाढालीत मराठी माणूस कुठे आहे?

राणे पुढे म्हणाले की, मी तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. काँग्रेस पोसले, भाजपला सत्ता दिली. आता माझ्या पक्षालाही जागा द्या आणि काय बदल घडवून आणतो ते पहा. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोकणी माणसाचा आहे. कोकणी माणसाने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे त्याच्यावर माझी भिस्त आहे. दरम्यान कोकण महोत्सवात आयविल एन्टरटेन्मेट प्रस्तूत नवरसांचा आविष्कार मार्तंड हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. निवेदन दीप काकडे, समाधान पिंपळे यांनी केले. साईगणेश रांजणेकर यांनी परफॉर्मन्स सादर केले.

महोत्सवात आज

आज बुधवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा बिझनेस फोरम आयोजित मी उद्योजक होणारच तसेच शिवाजी महाराजांवर कार्यक्रम प्राध्यापक नामदेव जाधव सादर करणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज