म. टा. प्रतिनिधी, शिर्डी
शिर्डी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी मंगळवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. मुंबई विमानतळावरून सायंकाळी ४.१५ वाजता उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान शिर्डी विमानतळावर ५ वाजता (४५ मिनिटांत) पोहोचले. या विमानातून आलेल्या तंत्रज्ञ, सुरक्षातज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने या विमानतळावरील धावपट्टीची चाचणी घेतल्यानंतर हे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी ‘ओके’ असल्याचा अहवाल दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण होणार असून १ ऑक्टोबरपासून सेवा सुरू होईल.
साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीला येतात. हे भाविक येथे विमानसेवा सुरू करण्याची मागणी दीर्घ काळापासून करीत होते. शिर्डीपासून १३ कि.मी. अंतरावर काकडी या गावाच्या परिसरात ८७५ एकरवर विमानतळ उभारण्यात आले आहे. यासाठी ३२० कोटींचा खर्च आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गेल्या आठवड्यात या विमानतळाचा परवाना मंजूर केला. मंगळवारी एअर इंडिया कंपनीच्या ७२ आसनी विमानाने या विमानतळाची तांत्रिक चाचणी घेतली. मुंबईहून आलेल्या पथकाने शिर्डी विमानतळाची धावपट्टीची कसून तपासणी केली. ट्रायल सक्सेस झाल्याने शिर्डी विमानतळ प्रवासी वाहतूक करण्यास योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोज १२ उड्डाणे
मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ येथून शिर्डीसाठी रोज ६ उड्डाणे होतील आणि तितकीच उड्डाणे परतीच्या प्रवासात असतील. मात्र सुरुवातीस मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांतून ही सेवा सुरू होणार आहे. यानंतर दिल्ली, बंगळुरू येथूनही सेवा सुरू होणार आहे.
शिर्डी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी मंगळवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. मुंबई विमानतळावरून सायंकाळी ४.१५ वाजता उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान शिर्डी विमानतळावर ५ वाजता (४५ मिनिटांत) पोहोचले. या विमानातून आलेल्या तंत्रज्ञ, सुरक्षातज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने या विमानतळावरील धावपट्टीची चाचणी घेतल्यानंतर हे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी ‘ओके’ असल्याचा अहवाल दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण होणार असून १ ऑक्टोबरपासून सेवा सुरू होईल.
साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीला येतात. हे भाविक येथे विमानसेवा सुरू करण्याची मागणी दीर्घ काळापासून करीत होते. शिर्डीपासून १३ कि.मी. अंतरावर काकडी या गावाच्या परिसरात ८७५ एकरवर विमानतळ उभारण्यात आले आहे. यासाठी ३२० कोटींचा खर्च आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गेल्या आठवड्यात या विमानतळाचा परवाना मंजूर केला. मंगळवारी एअर इंडिया कंपनीच्या ७२ आसनी विमानाने या विमानतळाची तांत्रिक चाचणी घेतली. मुंबईहून आलेल्या पथकाने शिर्डी विमानतळाची धावपट्टीची कसून तपासणी केली. ट्रायल सक्सेस झाल्याने शिर्डी विमानतळ प्रवासी वाहतूक करण्यास योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोज १२ उड्डाणे
मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ येथून शिर्डीसाठी रोज ६ उड्डाणे होतील आणि तितकीच उड्डाणे परतीच्या प्रवासात असतील. मात्र सुरुवातीस मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांतून ही सेवा सुरू होणार आहे. यानंतर दिल्ली, बंगळुरू येथूनही सेवा सुरू होणार आहे.