म. टा. प्रतिनिधी, नाशिक
माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे 'सायबर सुरक्षितता' हा विषय समाजातील सर्व घटकांसाठी महत्त्वाचा असून, त्याबाबत अधिक जनजागृती होण्यासाठी माध्यमांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे 'सायबर सुरक्षितता' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील,श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, माहिती अधिकारी किरण वाघ तसेच पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते. सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॅापिंग, ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार होतात. यासाठी स्मार्ट फोन, कॉम्प्युटर या माध्यमांचा वापर होतो. सर्व वयोगटातील नागरिक ई-प्रणालीचा वापर करतात. मात्र, हा वापर तेवढाच जबाबदरीपूर्वक होणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा जलद तपास लावण्यासाठी विशेष सायबर पोलिस स्टेशन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सिंगल यांनी दिली.
याबाबत घ्या काळजी
भूषण देशमुख यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर सादरीकरण केले. मोबाइलचा वापर अनावश्यक अपलोड किंवा डाउनलोडसाठी करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, चांगल्या दर्जाची संरक्षण यंत्रणा राबवावी, कॉम्प्युटरवरील माहितीचे नियमित बॅकअप घ्यावे, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारी माहिती उपस्थितांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे 'सायबर सुरक्षितता' हा विषय समाजातील सर्व घटकांसाठी महत्त्वाचा असून, त्याबाबत अधिक जनजागृती होण्यासाठी माध्यमांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे 'सायबर सुरक्षितता' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील,श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, माहिती अधिकारी किरण वाघ तसेच पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते. सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॅापिंग, ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार होतात. यासाठी स्मार्ट फोन, कॉम्प्युटर या माध्यमांचा वापर होतो. सर्व वयोगटातील नागरिक ई-प्रणालीचा वापर करतात. मात्र, हा वापर तेवढाच जबाबदरीपूर्वक होणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा जलद तपास लावण्यासाठी विशेष सायबर पोलिस स्टेशन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सिंगल यांनी दिली.
याबाबत घ्या काळजी
भूषण देशमुख यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर सादरीकरण केले. मोबाइलचा वापर अनावश्यक अपलोड किंवा डाउनलोडसाठी करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, चांगल्या दर्जाची संरक्षण यंत्रणा राबवावी, कॉम्प्युटरवरील माहितीचे नियमित बॅकअप घ्यावे, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारी माहिती उपस्थितांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.