म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या. एकाच वेळी व्यापाऱ्यांचे ऑफिस व घरे तपासली जात असून, त्यातून खरेदी- विक्री व्यवहार, बँक अकाउंटसह रोकड तपासली जात आहे. सुरुवातीला हा सर्व्हे असल्याची चर्चा होती; पण एकाच वेळी केलेल्या या कारवाईमुळे हे छापासत्र असल्याचे स्पष्ट झाले. या छाप्यांबाबत प्राप्तिकर विभागाने कमालीची गुप्तता पाळली आहे. हे छापासत्र पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
छाप्यांमध्ये जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, सटाणा, उमराणे आणि चांदवड येथील बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या छाप्यांमुळे काही ठिकाणी बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले. या कारवाईनंतर जिल्ह्यातील बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. काही ठिकाणी दोन दिवस, तर काही ठिकाणी एक दिवस या बाजार समित्या बंद राहणार आहेत.
कांद्याची साठेबाजी, भाववाढ आणि अचानक होणाऱ्या चढ-उतारामुळे दोन महिन्यांपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या छाप्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी ते कांद्याची आवक, खरेदी-विक्री या सगळ्यावर नजर ठेवून होते. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या संशयावरून व्यापाऱ्यांवर ही धाड टाकल्याचे बोलले जात आहे. जुलैमध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा कांदा ऑगस्ट महिन्यापर्यंत २५०० रुपये दराने विक्री झाल्यामुळे प्राप्तिकर विभागाने या व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचीही चर्चा आहे.
आधी केली होती तपासणी
जिल्ह्यातील बाजार समित्यांत ऑगस्टमध्ये कांद्याला तीन हजारांपर्यंत दर मिळाल्याने केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाच्या दोनसदस्यीय पथकाने १८ ऑगस्ट रोजी लासलगावला भेट दिली होती. दरवाढीचा प्रत्यक्षात कांदा उत्पादकांना फायदा होतो की नाही, याची पाहणी तेव्हा करण्यात आली होती. त्यानंतर मागील आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाकडे जिल्ह्यातील कांद्याचे उत्पादन, तसेच लासलगाव घाऊक दरांबाबतचा अहवाल मागविला होता.
या व्यापाऱ्यांची चौकशी
लासलगाव ः ओमप्रकाश राका, कांतीलाल सुराणा, पिंपळगाव बसवंत ः सोहनलाल भंडारी, सटाणा ः वर्धमान लुंकड, उमराणा ः खंडू पंडित देवरे, येवला ः संतोष अटल, चांदवड ः प्रवीण हेडा.
अशी झाली छापामारी
- जिल्हाभरात २४ ठिकाणी छापासत्र
- प्राप्तिकर विभागाच्या २४ पथकांचा सहभाग
- ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नाशिकमधील १५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा पथकांत समावेश
- व्यापाऱ्यांकडील खरेदी-विक्रीच्या नोंदींची तपासणी; तसेच साठाही तपासला.
- पुढील एक-दोन दिवस कारवाई सुरू राहण्याचा अंदाज
कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या. एकाच वेळी व्यापाऱ्यांचे ऑफिस व घरे तपासली जात असून, त्यातून खरेदी- विक्री व्यवहार, बँक अकाउंटसह रोकड तपासली जात आहे. सुरुवातीला हा सर्व्हे असल्याची चर्चा होती; पण एकाच वेळी केलेल्या या कारवाईमुळे हे छापासत्र असल्याचे स्पष्ट झाले. या छाप्यांबाबत प्राप्तिकर विभागाने कमालीची गुप्तता पाळली आहे. हे छापासत्र पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
छाप्यांमध्ये जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, सटाणा, उमराणे आणि चांदवड येथील बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या छाप्यांमुळे काही ठिकाणी बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले. या कारवाईनंतर जिल्ह्यातील बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. काही ठिकाणी दोन दिवस, तर काही ठिकाणी एक दिवस या बाजार समित्या बंद राहणार आहेत.
कांद्याची साठेबाजी, भाववाढ आणि अचानक होणाऱ्या चढ-उतारामुळे दोन महिन्यांपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या छाप्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी ते कांद्याची आवक, खरेदी-विक्री या सगळ्यावर नजर ठेवून होते. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या संशयावरून व्यापाऱ्यांवर ही धाड टाकल्याचे बोलले जात आहे. जुलैमध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा कांदा ऑगस्ट महिन्यापर्यंत २५०० रुपये दराने विक्री झाल्यामुळे प्राप्तिकर विभागाने या व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचीही चर्चा आहे.
आधी केली होती तपासणी
जिल्ह्यातील बाजार समित्यांत ऑगस्टमध्ये कांद्याला तीन हजारांपर्यंत दर मिळाल्याने केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाच्या दोनसदस्यीय पथकाने १८ ऑगस्ट रोजी लासलगावला भेट दिली होती. दरवाढीचा प्रत्यक्षात कांदा उत्पादकांना फायदा होतो की नाही, याची पाहणी तेव्हा करण्यात आली होती. त्यानंतर मागील आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाकडे जिल्ह्यातील कांद्याचे उत्पादन, तसेच लासलगाव घाऊक दरांबाबतचा अहवाल मागविला होता.
या व्यापाऱ्यांची चौकशी
लासलगाव ः ओमप्रकाश राका, कांतीलाल सुराणा, पिंपळगाव बसवंत ः सोहनलाल भंडारी, सटाणा ः वर्धमान लुंकड, उमराणा ः खंडू पंडित देवरे, येवला ः संतोष अटल, चांदवड ः प्रवीण हेडा.
अशी झाली छापामारी
- जिल्हाभरात २४ ठिकाणी छापासत्र
- प्राप्तिकर विभागाच्या २४ पथकांचा सहभाग
- ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नाशिकमधील १५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा पथकांत समावेश
- व्यापाऱ्यांकडील खरेदी-विक्रीच्या नोंदींची तपासणी; तसेच साठाही तपासला.
- पुढील एक-दोन दिवस कारवाई सुरू राहण्याचा अंदाज