म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बेपत्ता झालेल्या पावसाची आतुरतेने वाट पहात असलेल्या नाशिककरांसाठी खुषखबर आहे. पुढील आठवड्यात १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान परतीचा पाऊस नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल, अशी सुखवार्ता हवामान विभागाने दिली असून त्यामुळे पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजणाऱ्या पिकांनाही जीवदान मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
गेली दोन वर्षे शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावणारा पाऊस नाशिककरांवर यंदा काहीसा हिरमुसल्याचेच चित्र होते. जूनपासून सप्टेंबरच्या अगदी पंधरवड्यापर्यंत पावसाने सातत्याने लहरीपणाचेच दर्शन घडविले आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस त्या त्या महिन्याच्या सरासरीपर्यंत पाऊस पोहोचल्याचे यंदा पहावयास मिळाले. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठल, सुरगाणा यांसारख्या तालुक्यांमध्ये सातत्याने हजेरी लावणारा पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून गायब झाला आहे. किमान तापमान कमी होत असल्याने पावसाचे पूनरागमन होणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु, गुरुवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे.
पिकांना जीवदान
नाशिक जिल्ह्यात सोमवारी १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. पिवळ्या पडू लागलेल्या कांदा पिकासह अन्य पिकांनाही या पावसाचा फायदा होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
बेपत्ता झालेल्या पावसाची आतुरतेने वाट पहात असलेल्या नाशिककरांसाठी खुषखबर आहे. पुढील आठवड्यात १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान परतीचा पाऊस नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल, अशी सुखवार्ता हवामान विभागाने दिली असून त्यामुळे पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजणाऱ्या पिकांनाही जीवदान मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
गेली दोन वर्षे शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावणारा पाऊस नाशिककरांवर यंदा काहीसा हिरमुसल्याचेच चित्र होते. जूनपासून सप्टेंबरच्या अगदी पंधरवड्यापर्यंत पावसाने सातत्याने लहरीपणाचेच दर्शन घडविले आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस त्या त्या महिन्याच्या सरासरीपर्यंत पाऊस पोहोचल्याचे यंदा पहावयास मिळाले. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठल, सुरगाणा यांसारख्या तालुक्यांमध्ये सातत्याने हजेरी लावणारा पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून गायब झाला आहे. किमान तापमान कमी होत असल्याने पावसाचे पूनरागमन होणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु, गुरुवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे.
पिकांना जीवदान
नाशिक जिल्ह्यात सोमवारी १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. पिवळ्या पडू लागलेल्या कांदा पिकासह अन्य पिकांनाही या पावसाचा फायदा होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.