रामकुंड जीवरक्षकांना महापालिकेच्या प्रतिसादाची अपेक्षा
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
रामकुंडाची ओळख पवित्र धार्मिक तीर्थस्थान म्हणून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे. नाशिकला येणारा प्रत्येक पर्यटक रामकुंडावर हमखास येतो. या रामकुंडाच्या स्वच्छतेबाबत नेहमीच उदासीनता दिसते.
येथील पाणी कायमस्वरूपी स्वच्छ राहावे यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले आहे. रामकुंड स्वच्छ ठेवण्यासाठी येथील जीवरक्षक दलाने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी त्यांचा तोंडी प्रस्ताव मांडला असला तरी प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे खंत जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
गोदावरी नदीत धरणातून आवर्तन सोडलेले नसते त्यावेळी पाण्याचा प्रवाह स्थिर होतो. या स्थिर पाण्याचे शुद्धीकरणाची यंत्रणा महापालिकेने १६ वर्षांपूर्वी बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. रामकुंडातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी येथील दिवे विक्रेत्या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन दीपदान कुंड तयार केली आहेत, तरीही पाण्याची अस्वच्छता कमी झालेली नाही. रामकुंडावर सध्या ४० जीवरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत.
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
रामकुंडाची ओळख पवित्र धार्मिक तीर्थस्थान म्हणून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे. नाशिकला येणारा प्रत्येक पर्यटक रामकुंडावर हमखास येतो. या रामकुंडाच्या स्वच्छतेबाबत नेहमीच उदासीनता दिसते.
येथील पाणी कायमस्वरूपी स्वच्छ राहावे यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले आहे. रामकुंड स्वच्छ ठेवण्यासाठी येथील जीवरक्षक दलाने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी त्यांचा तोंडी प्रस्ताव मांडला असला तरी प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे खंत जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
गोदावरी नदीत धरणातून आवर्तन सोडलेले नसते त्यावेळी पाण्याचा प्रवाह स्थिर होतो. या स्थिर पाण्याचे शुद्धीकरणाची यंत्रणा महापालिकेने १६ वर्षांपूर्वी बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. रामकुंडातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी येथील दिवे विक्रेत्या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन दीपदान कुंड तयार केली आहेत, तरीही पाण्याची अस्वच्छता कमी झालेली नाही. रामकुंडावर सध्या ४० जीवरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत.