म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
करोना कालावधीत रेशन लाभार्थींना पंतप्रधान योजने अंतर्गत नोव्हेंबरमधील धान्य वितरणास २४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असली तरी तांत्रिक अडचणींपुढे रेशन दुकानदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य कसे द्यावे याची चिंता रेशन दुकानदारांना भेडसावू लागली आहे. पात्र लाभार्थी दुकानदारांकडेच तगादा लावत असून, काहीवेळा शाब्दिक वाददेखील उद्भवू लागले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.
गोरगरीबांना किमान दोनवेळचे जेवण मिळावे याकरीता केंद्र सरकारने गहू आणि तांदूळ मोफत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत मोफत धान्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, पंजाबसह देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे नोव्हेंबरचे धान्य जिल्हास्तरावर प्राप्त होण्यास विलंब झाला. त्यामुळे हे धान्य मुदतीत वितरीत करणे पुरवठा विभागाला शक्य झाले नाही. परंतु, हे धान्य उपलब्ध झाले असून, ते वितरीत करण्यासाठी सरकारने रेशन दुकानदारांना २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली. तांत्रिक अडचणींमुळे दुकानदारांचा धान्य वितरणाचा पर्याय १५ डिसेंबरपासून बंद झाला आहे. अजूनही सुमारे ३० टक्के लाभार्थींना धान्य वितरीत करता न आल्याने राज्य आणि केंद्र सरकारने पुन्हा एकदा वितरणास मुदतवाढ द्यावी. तसेच पूर्वीचा २४ डिसेंबरपर्यंतचा पर्याय खुला करावा, अशी विनंती जिल्हा पुरवठा विभागाद्वारे करण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी रास्त भाव दुकानदार राज्य संघटनेने पुरवठा सचिवांकडे आणि जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी सांगितले.
करोना कालावधीत रेशन लाभार्थींना पंतप्रधान योजने अंतर्गत नोव्हेंबरमधील धान्य वितरणास २४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असली तरी तांत्रिक अडचणींपुढे रेशन दुकानदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य कसे द्यावे याची चिंता रेशन दुकानदारांना भेडसावू लागली आहे. पात्र लाभार्थी दुकानदारांकडेच तगादा लावत असून, काहीवेळा शाब्दिक वाददेखील उद्भवू लागले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.
गोरगरीबांना किमान दोनवेळचे जेवण मिळावे याकरीता केंद्र सरकारने गहू आणि तांदूळ मोफत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत मोफत धान्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, पंजाबसह देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे नोव्हेंबरचे धान्य जिल्हास्तरावर प्राप्त होण्यास विलंब झाला. त्यामुळे हे धान्य मुदतीत वितरीत करणे पुरवठा विभागाला शक्य झाले नाही. परंतु, हे धान्य उपलब्ध झाले असून, ते वितरीत करण्यासाठी सरकारने रेशन दुकानदारांना २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली. तांत्रिक अडचणींमुळे दुकानदारांचा धान्य वितरणाचा पर्याय १५ डिसेंबरपासून बंद झाला आहे. अजूनही सुमारे ३० टक्के लाभार्थींना धान्य वितरीत करता न आल्याने राज्य आणि केंद्र सरकारने पुन्हा एकदा वितरणास मुदतवाढ द्यावी. तसेच पूर्वीचा २४ डिसेंबरपर्यंतचा पर्याय खुला करावा, अशी विनंती जिल्हा पुरवठा विभागाद्वारे करण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी रास्त भाव दुकानदार राज्य संघटनेने पुरवठा सचिवांकडे आणि जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी सांगितले.