नाशिक : विनाकारण रस्त्यावर फिरताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांना मूळ मालकाकडे परत देण्याची प्रक्रिया शहर पोलिसांनी सुरू केली आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून पोलिसांनी तब्बल २१०० वाहने जप्त केली आहेत. बंधपत्रासह मूळ कागदपत्रे सादर करणाऱ्या मालकांना ती परत करण्यात येत आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची तब्बल २१०० वाहने पोलिसांनी जप्त करण्यात आली होती. जप्त वाहने मूळ मालकाला परत देण्याबाबत पोलिस ठाणेप्रमुखांना आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेशही दिले आहेत. जप्त वाहने परत घेऊन जावीत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जप्त वाहनांची बंधपत्राद्वारे सुटका
विनाकारण रस्त्यावर फिरताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांना मूळ मालकाकडे परत देण्याची प्रक्रिया शहर पोलिसांनी सुरू केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2020, 4:00 am