खासगी कंपनीकडून दोन टप्प्यांत होणार काम
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
अंजनेरीच्या पुरातन मंदिरांना दोन वर्षांच्या आत झळाळी प्राप्त होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून अंजनेरी येथील १२ व्या शतकातील या पुरातन मंदिरांचा ठेवा जतन करण्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र पुरातत्त्व खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मंदिरांची डागडुजी अत्यंत कासव गतीने सुरू होती. मात्र नुकतीच खासदार हेमंत गोडसे यांनी या कामाला भेट देत ते काम पुरातत्त्व खात्याच्या परवानग्या घेत एका खासगी कंपनीला दिले आहे. हेरिटेज कन्सल्टिंग या कंपनीकडून हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.
सन १९१६ मध्ये तत्कालीन ब्रिटिश शासनाने अंजनेरीचा समावेश राष्ट्रीय स्मारकांमध्ये केला होता. मात्र याबाबत दुर्लक्षित राहिलेला हा मंदिरांचा अनमोल ठेवा जतन केल्यास तो येणाऱ्या पिढीसाठी ठेवा असेल. त्यामुळेच गतवर्षी एकूण १६.९ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष कामाला गती प्राप्त झाली नाही. किंबहुना वर्षभरातील बहुतांश दिवस हे काम बंद राहिल्याचेही बोलले जाते. त्यांनी पहिल्या टप्प्यात येथील १६ मंदिरांचे काम हाती घेतले असून, यामध्ये उपलब्ध त्या अवशेषात मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या वेळी एजन्सीचे डॉ. सुब्रह्मण्यम, वाजपेयी आणि बोयापती यांनी स्थळास भेट घेऊन तेथे कशा प्रकारे काम होणार आहे याची माहिती घेतली.
पर्यटकांसाठी विविध सुविधा
येथे मंदिरांच्या परिसरात १०० मीटर अविकसन करण्याच्या अटी आहेत. त्या जागा खासगी मालकीच्या असून, त्यांना भाडे तत्त्वावर कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. या सर्व १६ मंदिरांचा एक निसर्गरम्य परिसर तयार करून याठिकाणी वस्तू संग्रहालय, बगिचा करण्याचेही कंपनीच्या विचाराधीन आहे. येथे पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून अभ्यासकांना आकर्षण ठरेल असे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २०१९ पर्यंत ५ मंदिरांची पुनर्बांधणी आणि २०२२ पर्यंत सर्वच्या सर्व १६ मंदिरांसह परिसर विकास पूर्ण होईल, असा विश्वास उपस्थित तंत्रज्ञांनी व्यक्त केला. याबाबतचा प्रोजेक्टेड अहवाल तयार झाला आहे. याप्रसंगी निवृत्ती लांबे, नितीन पवार, कल्पेश कदम, रामनाथ बोडके उपस्थित होते.
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
अंजनेरीच्या पुरातन मंदिरांना दोन वर्षांच्या आत झळाळी प्राप्त होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून अंजनेरी येथील १२ व्या शतकातील या पुरातन मंदिरांचा ठेवा जतन करण्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र पुरातत्त्व खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मंदिरांची डागडुजी अत्यंत कासव गतीने सुरू होती. मात्र नुकतीच खासदार हेमंत गोडसे यांनी या कामाला भेट देत ते काम पुरातत्त्व खात्याच्या परवानग्या घेत एका खासगी कंपनीला दिले आहे. हेरिटेज कन्सल्टिंग या कंपनीकडून हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.
सन १९१६ मध्ये तत्कालीन ब्रिटिश शासनाने अंजनेरीचा समावेश राष्ट्रीय स्मारकांमध्ये केला होता. मात्र याबाबत दुर्लक्षित राहिलेला हा मंदिरांचा अनमोल ठेवा जतन केल्यास तो येणाऱ्या पिढीसाठी ठेवा असेल. त्यामुळेच गतवर्षी एकूण १६.९ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष कामाला गती प्राप्त झाली नाही. किंबहुना वर्षभरातील बहुतांश दिवस हे काम बंद राहिल्याचेही बोलले जाते. त्यांनी पहिल्या टप्प्यात येथील १६ मंदिरांचे काम हाती घेतले असून, यामध्ये उपलब्ध त्या अवशेषात मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या वेळी एजन्सीचे डॉ. सुब्रह्मण्यम, वाजपेयी आणि बोयापती यांनी स्थळास भेट घेऊन तेथे कशा प्रकारे काम होणार आहे याची माहिती घेतली.
पर्यटकांसाठी विविध सुविधा
येथे मंदिरांच्या परिसरात १०० मीटर अविकसन करण्याच्या अटी आहेत. त्या जागा खासगी मालकीच्या असून, त्यांना भाडे तत्त्वावर कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. या सर्व १६ मंदिरांचा एक निसर्गरम्य परिसर तयार करून याठिकाणी वस्तू संग्रहालय, बगिचा करण्याचेही कंपनीच्या विचाराधीन आहे. येथे पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून अभ्यासकांना आकर्षण ठरेल असे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २०१९ पर्यंत ५ मंदिरांची पुनर्बांधणी आणि २०२२ पर्यंत सर्वच्या सर्व १६ मंदिरांसह परिसर विकास पूर्ण होईल, असा विश्वास उपस्थित तंत्रज्ञांनी व्यक्त केला. याबाबतचा प्रोजेक्टेड अहवाल तयार झाला आहे. याप्रसंगी निवृत्ती लांबे, नितीन पवार, कल्पेश कदम, रामनाथ बोडके उपस्थित होते.