म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
ब्रह्मगिरीच्या खोदकामातील माती, मुरूम, दगड यांचा हिशेब महसूल खात्याने केला आणि दीड कोटी रुपये दंडाची रक्कम भरण्याची नोटीस संबंधित विकसकाला दिली आहे. मात्र, केवळ दंड केल्याने भविष्यातील संकटे दूर होणार नाहीत. त्यामुळे येथे वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ब्रह्मगिरी पर्वत पोखरल्याने आजूबाजूच्या परिसरात पावसाळ्यात आपत्तिजन्य परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे. सुपलीची मेट येथील शेकडो वर्षांपासूनच्या रहिवाशांवर माळीणसारख्या घटनेला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सुपलीची मेट येथे वीजपुरवठा करण्यासाठी खोदकाम आणि सपाटीकरण झालेल्या जमिनीच्या गटामध्ये वीजवाहक तारांचे खांब आहेत. जवळपास सोळा खांब बाजूची माती उकरल्याने अधांतरी स्थितीत आहेत. काही दिवसांतच सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर हे खांब कोसळण्याची चिन्हे आहेत. परिणामी सुपलीच्या मेट वस्तीचा वीजपुरवठाच खंडित होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने केवळ दंड करून हे प्रकरण संपवू नये, तर संबंधित विकसकाला सुपलीची मेट या वस्तीच्या खालच्या बाजूस सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासह वीजखांब पूर्ववत करण्याचे निर्देश देण्याची गरज निर्माण झाली आहे. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला मार्ग काढून देणे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे.
..तर जीवित हानीची भीती
महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे १,७२० ब्रास माती, २५० ब्रास मुरूम आणि ५० ब्रास दगड येथे खोदून पडलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तो डोंगराने सरळ या मातीवर आला, तर ही संपूर्ण माती, मुरूम आणि दगड वाहून आजूबाजूच्या शेतात जातील, तेथील जमिनीचे नुकसान करतील. तेथे असलेली घरे, झोपड्यांच्या नुकसानीसह जीवित हानी होण्याची भीती आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा रस्ता बुजण्यासह किकवी नदीपात्रालादेखील झळ पोहोचण्याची शक्यता आहे.
ब्रह्मगिरीच्या खोदकामातील माती, मुरूम, दगड यांचा हिशेब महसूल खात्याने केला आणि दीड कोटी रुपये दंडाची रक्कम भरण्याची नोटीस संबंधित विकसकाला दिली आहे. मात्र, केवळ दंड केल्याने भविष्यातील संकटे दूर होणार नाहीत. त्यामुळे येथे वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ब्रह्मगिरी पर्वत पोखरल्याने आजूबाजूच्या परिसरात पावसाळ्यात आपत्तिजन्य परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे. सुपलीची मेट येथील शेकडो वर्षांपासूनच्या रहिवाशांवर माळीणसारख्या घटनेला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सुपलीची मेट येथे वीजपुरवठा करण्यासाठी खोदकाम आणि सपाटीकरण झालेल्या जमिनीच्या गटामध्ये वीजवाहक तारांचे खांब आहेत. जवळपास सोळा खांब बाजूची माती उकरल्याने अधांतरी स्थितीत आहेत. काही दिवसांतच सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर हे खांब कोसळण्याची चिन्हे आहेत. परिणामी सुपलीच्या मेट वस्तीचा वीजपुरवठाच खंडित होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने केवळ दंड करून हे प्रकरण संपवू नये, तर संबंधित विकसकाला सुपलीची मेट या वस्तीच्या खालच्या बाजूस सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासह वीजखांब पूर्ववत करण्याचे निर्देश देण्याची गरज निर्माण झाली आहे. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला मार्ग काढून देणे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे.
..तर जीवित हानीची भीती
महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे १,७२० ब्रास माती, २५० ब्रास मुरूम आणि ५० ब्रास दगड येथे खोदून पडलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तो डोंगराने सरळ या मातीवर आला, तर ही संपूर्ण माती, मुरूम आणि दगड वाहून आजूबाजूच्या शेतात जातील, तेथील जमिनीचे नुकसान करतील. तेथे असलेली घरे, झोपड्यांच्या नुकसानीसह जीवित हानी होण्याची भीती आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा रस्ता बुजण्यासह किकवी नदीपात्रालादेखील झळ पोहोचण्याची शक्यता आहे.