अ‍ॅपशहर

नाशिकरोड रेल्वे स्थानकातही वाढता धोका!

मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकरोडच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनवरील पायऱ्या अरुंद व उंच असल्याने येथे गर्दीच्यावेळी दुर्घटना घडू शकते. यामुळे रेल्वे प्रशासनकडून उपाय योजने गरजेचे आहे.

Maharashtra Times 30 Sep 2017, 4:00 am
प्रशासनाकडून उपाय योजने गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम risk grow at nashikroad railway station
नाशिकरोड रेल्वे स्थानकातही वाढता धोका!


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकरोडच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनवरील पायऱ्या अरुंद व उंच असल्याने येथे गर्दीच्यावेळी दुर्घटना घडू शकते. यामुळे रेल्वे प्रशासनकडून उपाय योजने गरजेचे आहे.

नाशिकरोड स्थानकातून दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. दररोज सुमारे शंभर रेल्वेगाड्या धावतात. सकाळी पाचपासून ते दहापर्यंत तर सायंकाली पाच ते दहापर्यंत गर्दी असते. प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी प्लॅटफार्म एक व दोनवर धावपळ करावी लागते. यासाठी दोन प्लॅटफार्मवरील जिन्यांचा उपयोग करावा लागतो. त्यांच्या पायऱ्या अरुंद व उंचही आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना सावध पावले टाकावी लागतात. गर्दीच्यावेळी धक्का लागून एखादा प्रवासी पडल्यास मुंबईसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकरोड स्थानकातील पादचारी पुलावरही भिकारी व चरसी असतात. त्यांच्यामुळे प्रवाशांना अडथळा येतो.

पूल जोडणार कधी?

कुंभमेळ्यात प्लॅटफार्म क्रमांक चार तयार करण्यात आला. त्यावर जाण्यासाठी नवीन व प्रशस्त जिने तसेच, पादचारी पूल उभारण्यात आला. मात्र, त्याचा वापर फार कमी वेळा होतो. सायन्स ट्रेन आली तेव्हा चौथ्या फ्लॅटफार्म व या जिन्यांचा वापर झाला होता. हा व जुना पादचारी पूल जोडण्याचे नियोजन दोन वर्षांपासून झाले आहे. मात्र, कृतीच होत नाही. हे पूल जोडल्यास गर्दी व धोकाही कमी होईल.

सरकत्या जिन्यांची गरज

अनेक दिवसांच्या मागणीनंतर नाशिकरोड स्थानकात प्लॅटफार्म एक व दोनवर लिफ्ट उभारण्यात आली. स्थानकात मोठ्या व्यापारी संकुलात असतात तसे स्वयंचलित सरकते जिने उभारण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या दिवाळीत लिफ्टबरोबरच सरकत्या जिन्यांचे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप ते सुरू झालेले नाही. सूत्रांनी सांगितले की, या जिन्यांची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच काम सुरू होईल.

प्रवाशांचे साहस

एका पादचारी पुलावरून दुसऱ्यावर जाताना पायऱ्या चढाव्या लागतात. त्या चढणे कष्टप्रद असल्याने अनेक प्रवासी बिनधास्त रूळ ओलांडतात. आरपीएफ जवान मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाईही करते. परंतु, तरीही प्रवासी बोध घेत नाहीत. त्यामुळे दोन रुळांच्यामध्ये कायमचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ते ओलांडून प्रवासी जातात. दोन्ही प्लॅटफार्मवरील पादचारी पुलाची रुंदी वाढवली आणि जिन्यांच्या पायऱ्या प्रशस्त केल्यास प्रवासी त्यांचा नक्कीच उपयोग करतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज