अ‍ॅपशहर

'संतांची शिकवणूक देते जवानांना बळ'‍

देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या जवानांना संतांच्या शिकवणुकीतून आशिर्वादासह बळ मिळते, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

Maharashtra Times 25 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saints give strengthen to the indian soldiers
'संतांची शिकवणूक देते जवानांना बळ'‍


देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या जवानांना संतांच्या शिकवणुकीतून आशिर्वादासह बळ मिळते, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. ते श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठ येथे झालेल्या दुर्गा सप्तशती पाठ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर अण्णासाहेब मोरे, आमदार सीमा हिरे, नगराध्यक्षा तृप्ती धारणे, डॉ. प्रशांत पाटील, राजाराम पानगव्हाणे उपस्थित होते.

आजाराने कुटुंब अडचणीत येत असतात. ८० टक्के आजार हे अस्वच्छतेने होत असतात, हे आपण एक डॉक्टर म्हणून सांगत असल्याचे डॉ. भामरेंनी बोलताना सांगितले. सर्वांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहनही संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंनी यावेळी केले. राज्यात स्वच्छतेचा संदेश पोहचत असून, गावोगावी सेवेकरी यात सहभागी होऊन स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याबाबत जागर करीत आहेत, अशी माहिती अण्णासाहेब मोरेंनी यावेळी ‌दिली.


स्वच्छतेचा जागर

याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि अण्णासाहेब मोरे यांच्यासह सेवेकऱ्यांनी हातात झाडू घेत परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, आरोग्य अधिकारी हिरामण ठाकरे, शहर अभियंता रमेश कांगणे सहभागी झाले होते. याप्रसंगी स्वच्छता मोहिमेद्वारे नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज