सलाम
-
ग्रामीण भागाचे आरोग्य जपणारे हात
शब्दांकन : गौतम संचेती
करोनाचा प्रार्दुभाव अगोदर शहराताच असले असे वाटत होते. पण, हळूळहू त्याची पाळेमुळे ग्रामीण भागातही पोहचू लागली. त्यामुळे सुरक्षित वाटत असलेलेला ग्रामीण भागातही करोनाचे सावट दाट वाटू लागले. आरोग्याच्या विविध अडचणी, डॅाक्टर व कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या अशा प्रतिकूल परिस्थितील या विभागातील कर्मचारी काम करीत आहेत. त्यांच्या या कामात आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचा वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. असंख्य अडचणींवर मात्र करून करोनाच्या सावटाखाली ग्रामीण भागात काम करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांना सलाम. आरोग्यसेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सामाजिक त्रासाचाही मोठा सामना करावा लागत आहे. पण, त्यावरही ते मात करतात व सेवा देतात हे विशेष...
ग्रामीण भागातील आरोग्याचा भार जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्यधिकाऱ्यांवर असतो. पण, हे पदच रिक्त असल्यामुळे या पदाचा प्रभारी भार अतिरिक्त आरोग्यधिकारी डॉ. दावल साळवे यांच्याकडे आला. त्यांनी मात्र प्रभारी पद असताना सुद्ध ही परिस्थिती खंबीरपणे सांभाळली. झेडपीच्या सीईओ लीना बनसोड यांची मदतही तितकीच महत्त्वाची आहे. डॉ. दावल यांच्याकडे प्रभारी भार आल्यानंतर आठच दिवसात त्यांना करोनाचा प्रार्दुभाव रोखण्याचे निर्देश मिळाले. आजही सकाळी १० वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर ते रात्री १० वाजता घरी पोहोचत आहेत. विशेष म्हणजे त्यांची पत्नी देवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॅाक्टर असल्यामुळे त्याही जबाबदारी पार पाडत असतात.
डॉ. दावल यांच्याप्रमाणेच आरोग्य विभागातील सर्वांची आहे. असंख्य अडचणीला सामोर जाऊन ते ही सेवा देत आहे. जिल्ह्यात ६० टक्के लोकसंख्या या भागात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची जबाबदारी मोठी आहे. जिल्ह्यात १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५९२ उपकेंद्र आहेत. यात २६८ डॅाक्टर, ११०० च्या आसपास आरोग्य विभागाचे कर्मचारी, ३२ मानव सेवी डॉक्टर, १७० कम्युनिटी हेल्थ ऑफीसर आहेत. त्यात १०६ अॅम्ब्युलन्स या भागात फिरत असतात. या सर्वांतून आज ग्रामीण भागात करोनाला रोखता आले आहे.
परदेशात कामानिमित्त असलेले व पर्यटनाला गेलेले ग्रामीण भागातील नागरिक जेव्हा आपल्या गावी परतले. तेव्हा येते भीती तयार झाली. पण, आरोग्य विभागाने या सर्वांची नोंद घेऊन त्यांची अगोदर तपासणी केली. त्यानंतर ज्या रुग्णांमध्ये करोनाचे लक्षणे दिसली. त्यांना जिल्हा आरोग्य केंद्रात पाठवले. काही जणांचे घरातच विलगीकरण करण्यात आले. परदेशातील लोकांचा विषय संपत नाही तोच मुंबई, पुणे व इतर शहरातील लोक ग्रामीण भागात येवू लागले व त्यातून पुन्हा भीती निर्माण झाली. या सर्वांची संख्या ४० हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची जबाबदारी आणखी वाढली. पण, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी सर्वेक्षण केले व त्यातून करोना बाधितांचा शोधही घेतला जाऊ लागला. आजही हे कर्मचारी रोज ३० घरांचे रोज सर्वेक्षण करतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी परप्रातांतील अडकलेल्या कामगारांची काळजी ग्रामीण भागात इगतपुरी व देवळा तालुक्यातील आरोग्य विभाग घेत आहे. या सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि आशा वर्कर, अंगणवाडीसेविका यांचे कौतुक व्हायलाच हवे