म. टा .प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील विविध चौकात आणि ठिकठिकाणी गटारीवरील ढापे गायब झाली आहेत. यामुळे उद्भविणाऱ्या समस्यांची बातमी नुकतीच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिध्द केली होती. या बातमीची दखल घेत हे ढापे बसविण्यास सुरुवात झाली आहे. गटारीवरील ढापे निघाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघातही यामुळे झाले होते. रात्रच्यावेळी अपघातांचे प्रमाण वाढले होते तसेच रात्री पायी चालणाऱ्यांवरही अनेकदा या ढाप्यांमुळे पडण्याची वेळ आली होती. याबाबतची बातमी प्रसिद्ध करताच पंचवटी विभागातील महापालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली. गटारींची दुरुस्ती करून ढापे बसविण्यास या भागात सुरुवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे कर्मचाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. या तातडीना सुरू झालेल्या कामाबद्दल नागरिकांनी ‘मटा’चे आभार मानले.
गटारींवर बसविले ढापे
‘महाराष्ट्र टाइम्स’ने याबाबत बातमी प्रसिध्द केली होती. या बातमीची दखल घेत हे ढापे बसविण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Times 16 Mar 2016, 2:56 am