अ‍ॅपशहर

उद्यापासून परतीचा प्रवास

साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवीचा चैत्रोत्सवात आतापर्यंत सुमारे दहा लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले.

Maharashtra Times 12 Apr 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saptshrung yatra 10 lakh bhavik
उद्यापासून परतीचा प्रवास


साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवीचा चैत्रोत्सवात आतापर्यंत सुमारे दहा लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. गुरुवारी (दि. १३) चैत्रोत्सव संपणार असल्याने भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मंगळवारी लाखभर भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्या पायरीपर्यंत भाविक बारीत उभे होते. दुपारनंतर भाविकांनी गड सोडण्यावर भर दिला.

उत्तर महाराष्ट्र हे सप्तशृंग देवीचे माहेर समजले जाते. चैत्रोत्सवामुळे गडावर लाखोंच्या संख्येने धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील भाविक भगवतीच्या भेटीसाठी पायी येतात. एप्रिल महिन्यात असलेल्या कडक उन्हाची कुठलीही तमा न बाळगता लहान मुलांसह, महिला, पुरुष तसेच वयोवृद्ध शेकडो किलोमीटरचे अंतर कापतात.

यंदा उत्तर महाराष्टातून पायी येणाऱ्या भाविकांना चावदस व पौर्णिमा असा समन्व्य साधतांना अडथळा आला. त्याचा मोठा परिणाम पायी यात्रेवर पडला व भाविकांची पायी यात्रेची संख्या रोडावली. कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव भागातील व्यापारी, शेतकरी तसेच विविध राजकीय पक्ष, गणेश मंडळ पदाधिकारी यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही उसाचा रस, पाणपोई, नाश्ता, जेवण भाविक यात्रेकरूंना मिळत होते. सप्तशृंग गडावर मंगळवारी सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान विभागीय आयुक्त एकनाथ डवले, सप्तशृंग देवस्थान विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, मुंबई येथील भाविक गुलशन पटेल, देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी पूजा केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज