अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे पाच लाख रुपयांचे बीज भांडवल कर्ज योजना सुरू आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येते. नाशिक जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षात १५० प्रकरणांचे उद्दिष्ट महामंडळाकडून देण्यात आले आहे. अग्रणी बँकेमार्फत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत बेरोजगार उमेदवारांना पाच लाखांपर्यंत व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचा सहभाग ६० टक्के व महामंडळाचा ३५ टक्के आहे. तर, उर्वरित पाच टक्के रक्कम अर्जदाराची असते. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या रकमेवर द.सा.द.शे. अवघे चार टक्के व्याज आकरण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी वसुली ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक याप्रमाणे करण्यात येते.
या आहेत अटी
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व खुल्या प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे जिल्ह्यातील स्थायी वास्तव्य किमान मागील तीन वर्षे असावे. वय १८ ते ४५ या दरम्यान असावे. अर्जदाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदवलेले असावे. अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये सहा लाखांच्या आत असावे. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी.
येथे मिळेल सविस्तर माहिती
याबाबत अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक तिवारी लेन, मेनरोड, नाशिक या कार्यालयाकडे संपर्क साधवा. एकूण प्रकरणांची संख्या १५० इतकी असल्याने इच्छुकांनी त्वरित चौकशी करावी.
बेरोजगार युवकांसाठी ही महत्त्वाची योजना असून, पात्र उमेदवारांनी तिचा लाभ घेऊन स्वयंरोजगार प्राप्त करावा.
- संपत चाटे, सहायक संचालक, कौशल्य विकास
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे पाच लाख रुपयांचे बीज भांडवल कर्ज योजना सुरू आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येते. नाशिक जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षात १५० प्रकरणांचे उद्दिष्ट महामंडळाकडून देण्यात आले आहे. अग्रणी बँकेमार्फत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत बेरोजगार उमेदवारांना पाच लाखांपर्यंत व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचा सहभाग ६० टक्के व महामंडळाचा ३५ टक्के आहे. तर, उर्वरित पाच टक्के रक्कम अर्जदाराची असते. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या रकमेवर द.सा.द.शे. अवघे चार टक्के व्याज आकरण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी वसुली ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक याप्रमाणे करण्यात येते.
या आहेत अटी
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व खुल्या प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे जिल्ह्यातील स्थायी वास्तव्य किमान मागील तीन वर्षे असावे. वय १८ ते ४५ या दरम्यान असावे. अर्जदाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदवलेले असावे. अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये सहा लाखांच्या आत असावे. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी.
येथे मिळेल सविस्तर माहिती
याबाबत अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक तिवारी लेन, मेनरोड, नाशिक या कार्यालयाकडे संपर्क साधवा. एकूण प्रकरणांची संख्या १५० इतकी असल्याने इच्छुकांनी त्वरित चौकशी करावी.
बेरोजगार युवकांसाठी ही महत्त्वाची योजना असून, पात्र उमेदवारांनी तिचा लाभ घेऊन स्वयंरोजगार प्राप्त करावा.
- संपत चाटे, सहायक संचालक, कौशल्य विकास