म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनीशल कचरा नियंत्रण कायदा, २००६ नुसार रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी शहराच्या सहाही विभागांतून अंदाजे चारशे किलो प्लास्टिक व अंदाजे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रविवारी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना कापडी पिशव्या घेऊनच निघावे लागले. व्यापाऱ्यांनीही कागद, कापडी पिशव्यांचाच वस्तू देण्यासाठी वापर केला.
नाशिक महानगरपालिका कायक्षेत्रात २३ जूनपासून प्लास्टिकबंदी करण्यात आली. पहिल्या दिवशी प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर रविवार असूनही दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू ठेवण्यात आली. या कारवाईसाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात सहा निरीक्षक नेमण्यात आले असून, बाजारपेठा व संकुलांमध्ये कडक तपासणी करण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी याचा चांगलाच धसका घेतला. बाजारात नागरिक कापडाच्या पिशव्या घेऊन जाताना दिसत होते. त्याचप्रमाणे भाजीविक्रेत्यांनी देखील पिशवी घेऊन येणाऱ्यांनाच भाजी देण्यास प्राधान्य दिले. कारवाईच्या आदल्या दिवशी स्वच्छता निरीक्षकांनी बाजारात फिरून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांना सूचनादेखील केल्या होत्या. रविवारी व्यापाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली. नाशिकरोड विभागात जेलरोडवर असलेल्या भवानी स्वीट्स या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडल्याने त्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सुभाषरोडवर असलेल्या काही मटण विक्रेत्यांवरदेखील कारवाई करण्यात आली. या परिसरात स्वच्छता नसल्याने अधिकाऱ्यांनी कडक सूचना केल्या. नाशिकरोड विभागात २० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले असून, २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पंचवटी विभागातदेखील तीन व्यापाऱ्यांकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडला. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून १५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सर्वात जास्त कारवाई नाशिक शहरातील पूर्व विभागात करण्यात आली. या ठिकाणी ७ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर कचरा आढळल्याने त्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. शालिमार परिसरात असलेल्या फळविक्रेत्यांची देखील तपासणी करण्यात आली. पश्चिम विभागात दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच किरकोळ प्लास्टिक जप्त करण्यात आले.
अडगळीतून निघाल्या कापडी पिशव्या
नागरिकांना रिकाम्या हाती जाऊन वस्तू खरेदी करण्याची सवय लागली होती. मात्र महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबल्याने अडगळीत गेलेल्या कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत. नागरिक मुकाट्याने गाडीच्या डिकीत कापडी पिशव्या ठेवू लागल्याचे दृष्य पहायला मिळते आहे. महापालिकेने केलेली प्लास्टिकबंदी योग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला थोडा त्रास होईल, मात्र एकदा सवय लागल्यावर त्याचे चांगले परिणाम याच पावसाळ्यात पहायला मिळतील असे नागरिकांचे म्हणणे आहे. भाजी विक्रेतेही या त्रासातून बाहेर पडले असून, प्लास्टिकच्या पिशव्या खरेदीचा त्यांचा मोठा खर्च वाचला आहे.
सरकारने योग्य कारवाई केली आहे. नाशिक महापालिकेने कडक कारवाई करावी व प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करावे. सवय लागण्यास थोडा अवधी लागेल. परंतु, त्याचे दूरगामी चांगले परिणाम होतील.
- उल्हास शुक्ल, नागरिक
--
लोक पावशेर भाजी घ्यायचे व प्लास्टिक पिशवी मागायचे. बरे झाले सरकारने हा कायदा केला. आमचे पैसेही वाचतील व पावसाळ्यात पाणीही तुंबणार नाही.
-सरिता पवार, भाजी विक्रेती
नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनीशल कचरा नियंत्रण कायदा, २००६ नुसार रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी शहराच्या सहाही विभागांतून अंदाजे चारशे किलो प्लास्टिक व अंदाजे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रविवारी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना कापडी पिशव्या घेऊनच निघावे लागले. व्यापाऱ्यांनीही कागद, कापडी पिशव्यांचाच वस्तू देण्यासाठी वापर केला.
नाशिक महानगरपालिका कायक्षेत्रात २३ जूनपासून प्लास्टिकबंदी करण्यात आली. पहिल्या दिवशी प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर रविवार असूनही दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू ठेवण्यात आली. या कारवाईसाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात सहा निरीक्षक नेमण्यात आले असून, बाजारपेठा व संकुलांमध्ये कडक तपासणी करण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी याचा चांगलाच धसका घेतला. बाजारात नागरिक कापडाच्या पिशव्या घेऊन जाताना दिसत होते. त्याचप्रमाणे भाजीविक्रेत्यांनी देखील पिशवी घेऊन येणाऱ्यांनाच भाजी देण्यास प्राधान्य दिले. कारवाईच्या आदल्या दिवशी स्वच्छता निरीक्षकांनी बाजारात फिरून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांना सूचनादेखील केल्या होत्या. रविवारी व्यापाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली. नाशिकरोड विभागात जेलरोडवर असलेल्या भवानी स्वीट्स या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडल्याने त्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सुभाषरोडवर असलेल्या काही मटण विक्रेत्यांवरदेखील कारवाई करण्यात आली. या परिसरात स्वच्छता नसल्याने अधिकाऱ्यांनी कडक सूचना केल्या. नाशिकरोड विभागात २० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले असून, २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पंचवटी विभागातदेखील तीन व्यापाऱ्यांकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडला. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून १५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सर्वात जास्त कारवाई नाशिक शहरातील पूर्व विभागात करण्यात आली. या ठिकाणी ७ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर कचरा आढळल्याने त्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. शालिमार परिसरात असलेल्या फळविक्रेत्यांची देखील तपासणी करण्यात आली. पश्चिम विभागात दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच किरकोळ प्लास्टिक जप्त करण्यात आले.
अडगळीतून निघाल्या कापडी पिशव्या
नागरिकांना रिकाम्या हाती जाऊन वस्तू खरेदी करण्याची सवय लागली होती. मात्र महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबल्याने अडगळीत गेलेल्या कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत. नागरिक मुकाट्याने गाडीच्या डिकीत कापडी पिशव्या ठेवू लागल्याचे दृष्य पहायला मिळते आहे. महापालिकेने केलेली प्लास्टिकबंदी योग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला थोडा त्रास होईल, मात्र एकदा सवय लागल्यावर त्याचे चांगले परिणाम याच पावसाळ्यात पहायला मिळतील असे नागरिकांचे म्हणणे आहे. भाजी विक्रेतेही या त्रासातून बाहेर पडले असून, प्लास्टिकच्या पिशव्या खरेदीचा त्यांचा मोठा खर्च वाचला आहे.
सरकारने योग्य कारवाई केली आहे. नाशिक महापालिकेने कडक कारवाई करावी व प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करावे. सवय लागण्यास थोडा अवधी लागेल. परंतु, त्याचे दूरगामी चांगले परिणाम होतील.
- उल्हास शुक्ल, नागरिक
--
लोक पावशेर भाजी घ्यायचे व प्लास्टिक पिशवी मागायचे. बरे झाले सरकारने हा कायदा केला. आमचे पैसेही वाचतील व पावसाळ्यात पाणीही तुंबणार नाही.
-सरिता पवार, भाजी विक्रेती