अ‍ॅपशहर

मुंबई महापालिकेत सेना-भाजपचीच युती’

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे नैसर्गिक मित्र आहेत. दोन्ही नेत्यांनी अमंगल युती न करता परंपरागत युतीच्या मार्गाने चालायला हवे. दोन भावांची भांडणे होतात तशी ही घरातली भांडणे आहेत.भांडण संपवायचे म्हटले की थोडा वेळ लागणार. राज्यातील सरकार स्थिर असून, मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांची युती होईल, असा विश्वास महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

Maharashtra Times 28 Feb 2017, 9:06 am
म. टा प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sena bjp alliance in mumbai corporation
मुंबई महापालिकेत सेना-भाजपचीच युती’


शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे नैसर्गिक मित्र आहेत. दोन्ही नेत्यांनी अमंगल युती न करता परंपरागत युतीच्या मार्गाने चालायला हवे. दोन भावांची भांडणे होतात तशी ही घरातली भांडणे आहेत.

भांडण संपवायचे म्हटले की थोडा वेळ लागणार. राज्यातील सरकार स्थिर असून, मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांची युती होईल, असा विश्वास महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. त्यामुळे कुणीही मनातले मांडे खाऊ नयेत असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. बांधकाम ‌विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, सायखेडा येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. राज्यात १४ हजार पुलांचे तीन वर्षांत पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे. त्यासाठी साडेचार हजार कोटी खर्चाचा इस्टीमेट तयार करीत आहेत. पहिल्या तीन वर्षांत धोकादायक पुलांची तातडीने दुरूस्ती केली जाणार आहे. सायखेडा येथील पुलासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर केले असून दुरूस्तीमुळे अशा पुलांचे आर्युमान आठ ते १० वर्षांनी वाढणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज