म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या १५ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाङ्मय स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट पुस्तकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
साहित्यिकांनी आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती, परिचय, फोटो व पोस्टाचे पाच रुपयांची ५ तिकिटे पाठवावीत, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे. १ जानेवारी २०१९ ते आजअखेर प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती दि. ५ डिसेंबरपर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर ४१४००३ येथे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, बाल वाङ्मय यासह सर्व प्रकारच्या उत्कृष्ट कलाकृतीस स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन संमेलनामध्ये गौरविण्यात येईल.