म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी गरीब, भुकेल्या नागरिकांसाठी मोलाचा आधार ठरत असून, जिल्ह्यात दररोज दहा हजारांहून अधिक बांधवांचे शिवथाळीमुळे पोट भरत असल्याची स्थिती आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी गरीब आणि गरजू नागरिकांना किमान एकवेळ पोटभर जेवण मिळावे याकरिता शिवभोजन थाळी योजनेची घोषणा केली. २६ जानेवारी २०२० पासून राज्यभर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. येत्या २६ जानेवारीस या योजनेला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. नाशिक आणि मालेगाव शहरासह ग्रामीण भागातही या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: करोना संकटकाळात लॉकडाउनमध्ये ही योजना गरिबांना मोठा आधार देणारी ठरली. कामधंदे ठप्प झाल्याने रोजगार गमावलेल्या नागरिकांचे शिवभोजन थाळीनेच पोट भरले. ही योजना सुरू झाली तेव्हा नाशिक शहरात तीन, तर मालेगाव शहरात एक केंद्र होते. जिल्ह्यातील केंद्रांची संख्या आता ८३ पर्यंत गेली आहे.
--
शहर, मालेगावात पसंती
नाशिक शहरात ३८, तर मालेगाव शहरात पाच अशा ४३ शिवथाळी केंद्रांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना जेवण पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात ३८ केंद्रांच्या माध्यमातून चार हजार ९०० थाळ्यांचे दररोज सकाळी वितरण होते. मालेगाव शहरातील पाच केंद्रांच्या माध्यमातून दररोज साडेसातशे थाळ्या वितरित केल्या जातात. थाळीमध्ये दोन चपात्या, वरण, भात आणि भाजीचा समावेश असतो. सरकारला प्रतिथाळी ५० रुपये खर्च करावा लागत असला, तरी गरजू व्यक्तीला १० रुपयांतच जेवण मिळते.
--
तेरा तालुक्यांतूनही प्रतिसाद
नाशिक आणि मालेगाव हे दोन तालुके वगळता जिल्ह्यातील अन्य १३ तालुक्यांमध्ये दररोज चार हजार ३७५ लाभार्थी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत आहेत. या १३ तालुक्यांत ४० शिवभोजन केंद्रे आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या येवला मतदारसंघात सर्वाधिक सहा केंद्रे आहेत. निफाडमध्ये पाच, कळवण आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी चार केंद्रे आहेत. एकेका केंद्रावरून किमान ७५ ते अधिकाधिक १५० थाळ्यांचे वितरण होत आहे.
--
केंद्रांची संख्या आणि होणारे वितरण
ठिकाण केंद्र थाळी संख्या
नाशिक शहर ३८ ४९००
मालेगाव शहर ०५ ७५०
येवला ०६ ७००
त्र्यंबकेश्वर ०३ ५२५
सिन्नर ०४ ५२५
बागलाण ०२ ३००
देवळा ०२ २००
सुरगाणा ०२ १५०
कळवण ०४ ४५०
पेठ ०२ २००
चांदवड ०३ ३००
इगतपुरी ०२ २००
निफाड ०५ ५००
दिंडोरी ०२ २००
नांदगाव ०३ ३५०
एकूण ८३ १०,०२५
राज्य सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी गरीब, भुकेल्या नागरिकांसाठी मोलाचा आधार ठरत असून, जिल्ह्यात दररोज दहा हजारांहून अधिक बांधवांचे शिवथाळीमुळे पोट भरत असल्याची स्थिती आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी गरीब आणि गरजू नागरिकांना किमान एकवेळ पोटभर जेवण मिळावे याकरिता शिवभोजन थाळी योजनेची घोषणा केली. २६ जानेवारी २०२० पासून राज्यभर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. येत्या २६ जानेवारीस या योजनेला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. नाशिक आणि मालेगाव शहरासह ग्रामीण भागातही या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: करोना संकटकाळात लॉकडाउनमध्ये ही योजना गरिबांना मोठा आधार देणारी ठरली. कामधंदे ठप्प झाल्याने रोजगार गमावलेल्या नागरिकांचे शिवभोजन थाळीनेच पोट भरले. ही योजना सुरू झाली तेव्हा नाशिक शहरात तीन, तर मालेगाव शहरात एक केंद्र होते. जिल्ह्यातील केंद्रांची संख्या आता ८३ पर्यंत गेली आहे.
--
शहर, मालेगावात पसंती
नाशिक शहरात ३८, तर मालेगाव शहरात पाच अशा ४३ शिवथाळी केंद्रांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना जेवण पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात ३८ केंद्रांच्या माध्यमातून चार हजार ९०० थाळ्यांचे दररोज सकाळी वितरण होते. मालेगाव शहरातील पाच केंद्रांच्या माध्यमातून दररोज साडेसातशे थाळ्या वितरित केल्या जातात. थाळीमध्ये दोन चपात्या, वरण, भात आणि भाजीचा समावेश असतो. सरकारला प्रतिथाळी ५० रुपये खर्च करावा लागत असला, तरी गरजू व्यक्तीला १० रुपयांतच जेवण मिळते.
--
तेरा तालुक्यांतूनही प्रतिसाद
नाशिक आणि मालेगाव हे दोन तालुके वगळता जिल्ह्यातील अन्य १३ तालुक्यांमध्ये दररोज चार हजार ३७५ लाभार्थी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत आहेत. या १३ तालुक्यांत ४० शिवभोजन केंद्रे आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या येवला मतदारसंघात सर्वाधिक सहा केंद्रे आहेत. निफाडमध्ये पाच, कळवण आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी चार केंद्रे आहेत. एकेका केंद्रावरून किमान ७५ ते अधिकाधिक १५० थाळ्यांचे वितरण होत आहे.
--
केंद्रांची संख्या आणि होणारे वितरण
ठिकाण केंद्र थाळी संख्या
नाशिक शहर ३८ ४९००
मालेगाव शहर ०५ ७५०
येवला ०६ ७००
त्र्यंबकेश्वर ०३ ५२५
सिन्नर ०४ ५२५
बागलाण ०२ ३००
देवळा ०२ २००
सुरगाणा ०२ १५०
कळवण ०४ ४५०
पेठ ०२ २००
चांदवड ०३ ३००
इगतपुरी ०२ २००
निफाड ०५ ५००
दिंडोरी ०२ २००
नांदगाव ०३ ३५०
एकूण ८३ १०,०२५