अ‍ॅपशहर

'घटिका भरत आली; जुलैमध्ये भूकंप'

'आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबतच आहे. ते आपल्याला संपवण्यासाठी चाली खेळताहेत. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात मोठी लढाई आहे. त्यासाठी सज्ज राहा,' असं आवाहन करतानाच, 'घटिका भरत आलीय. जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल,' असा सूचक इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज दिला.

Maharashtra Times 10 Jun 2017, 3:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena leader sanjay raut attacks fadnavis government over farmer issue
'घटिका भरत आली; जुलैमध्ये भूकंप'


'आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबतच आहे. ते आपल्याला संपवण्यासाठी चाली खेळताहेत. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात मोठी लढाई आहे. त्यासाठी सज्ज राहा,' असं आवाहन करतानाच, 'घटिका भरत आलीय. जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल,' असा सूचक इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज दिला.

शिवसेनेच्या संपर्क अभियानाला मार्गदर्शन करताना ते नाशिकमध्ये बोलत होते. शेतकरी आंदोलन आणि समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या भूमी संपादनाच्या मुद्द्यांवरून राऊत यांनी भाजपवर चौफेर टीका केली. 'समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून त्या उद्योजकांच्या खिशात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचा घास घेणारा भूमी अधिग्रहण कायदा शिवसेनेच्या विरोधामुळं थांबला आहे. समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही हा उद्धव ठाकरेंचा शब्द आहे', असं राऊत म्हणाले.

'गेल्या तीन वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्यांच्या राज्यात आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचं,' असा सवाल त्यांनी केला. 'कर्जमुक्तीचे शिवसेनेचे अर्ज घराघरांत पोहोचवा, असं आवाहन शिवसैनिकांना करतानाच, 'आम्हाला सरसकट कर्जमाफी हवीय,' अशी ठाम मागणीही त्यांनी केली.

उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत दिवाकर रावते हे सहभागी होतील. ते मंत्री असल्यानं बैठकीत सहभागी होऊन पक्षाची ठाम भूमिका मांडतील,' असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज