नाशिक : करोनाच्या संसर्गाचा धोका कमी होताच संजय राऊत यांनी आता पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी ते सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाची बांधणी करणं हे आमचं कर्तव्य आहे. सत्ता असेल किंवा नसेल शिवसेना गुलामगिरीत जगत नाही. शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्त्वाचा आहे, असं यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. करोना काळात संघटनेच्या कामाकडे लक्ष देता आली नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. यामध्ये राजकारण नाही. पक्षामध्ये संघटना असणं महत्त्वाचं आहे, असं राऊत म्हणाले. यावेळी बोलताना बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी स्वाभिमानाचं दुसरं नाव आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्राकडे हात जोडून विनंती केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा निर्णय त्यांनी घ्यावा असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. खरंतर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतं.
या भेटीनंतर ठाकरे व मोदी यांच्यात स्वतंत्र चर्चाही झाली. यावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास वाघाशी मैत्री करायला आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. त्यावर, 'कोणाशी मैत्री करायची ते वाघ ठरवतो,' असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं होतं.
यावेळी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्राकडे हात जोडून विनंती केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा निर्णय त्यांनी घ्यावा असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. खरंतर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतं.
या भेटीनंतर ठाकरे व मोदी यांच्यात स्वतंत्र चर्चाही झाली. यावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास वाघाशी मैत्री करायला आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. त्यावर, 'कोणाशी मैत्री करायची ते वाघ ठरवतो,' असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं होतं.