अ‍ॅपशहर

तर ‘तो’ पैसा गेला कुठे?

स्वातंत्र्योत्तर काळातील ६५ वर्षांत महाराष्ट्र राज्यावर अडीच लाख कोटी रुनसे कर्ज होते. मात्र, केवळ गेल्या चार वर्षांतील राज्यातील युती सरकारच्या काळात राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा साडेपाच लाख कोटी रुपये झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 19 Feb 2019, 7:41 am
छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम so where did he go chhagan bhujbal questions government
तर ‘तो’ पैसा गेला कुठे?


म. टा. वृत्तसेवा, येवला

स्वातंत्र्योत्तर काळातील ६५ वर्षांत महाराष्ट्र राज्यावर अडीच लाख कोटी रुनसे कर्ज होते. मात्र, केवळ गेल्या चार वर्षांतील राज्यातील युती सरकारच्या काळात राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा साडेपाच लाख कोटी रुपये झाला आहे. तर, गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या काळात देशातील हेच कर्ज ५१ लाख हजार कोटींवरून ८२ लाख हजार कोटींवर गेले आहे. एकिकडे कर्जाचा हा बोजा वाढलेला असताना, दुसरीकडे देशातील सर्वसामन्यांच्या पदरात काहीच पडले नाही. मग, कर्ज काढलेला पैसा नेमका गेला कुठे?, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी येवल्यात केला.

आमदार छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि.१८) आपल्या येवला मतदार संघातील विविध विकासकामांचे उद्घाटने व भूमिपूजनांचा बार उडवून दिला. या कार्यक्रमांत भुजबळ यांनी युती सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. यापूर्वीच्या राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात येवल्याप्रमाणेच उभ्या महाराष्ट्रात विकासकामे करण्यासाठीचा प्रयत्न केला जावून विकासाचा समतोल राखला गेला होता. मात्र, सध्याच्या सरकारकडे निधीच नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात विकासकामाचा वेग कमी झाला आहे. असे सांगत राज्यासह केंद्राच्या डोक्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा बघता हा पैसा नेमका कुठे गेला? असा सवाल भुजबळ यांनी केला. येवला प्रशासकीय कार्यालय संपूर्ण भारतातील एक अभिनव आणि महत्वाचा प्रकल्प असल्याचे सांगत, येवला तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय व्हिलेज आपलेसे वाटेले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उषाताई शिंदे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, नगरसेवक संकेत शिंदे, सुनील पैठणकर, सचिन कळमकर, हरिभाऊ जगताप, रामदास गायकवाड आदी उपस्थित होते.

मांजरपाड्याचे काम पूर्ण

मांजरपाडा प्रकल्पाचे काम हे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच या विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून यात केवळ एका दिवसाचेच काम बाकी असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज