नाशिक :
सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सहा जणांना शनिवारी २० जानेवारी रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. सोनई हत्याकांडाने रामायणातील राक्षसांची आठवण झाल्याचं सांगत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाले होते.
सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने १५ जानेवारी रोजी सहा जणांना दोषी ठरवले होते. या सहाही जणांना आज शिक्षा ठोठावण्यात येणार होती. त्यामुळे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम या सुनावणीला आज न्यायालयात हजर होते. संपूर्ण राज्याचे लक्षही या सुनावणीकडे लागले होते. न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाल्याने आता शनिवारी आरोपींना शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.
यावेळी निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १३ मुद्दे उपस्थित केले. आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली. तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं. ज्या पद्धतीने तुकडे करून खून केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला.
या हत्याकांडाचा आरोपींना कुठला पश्चाताप झालेला नाही, त्यांनी तशी भावना कोर्टात व्यक्त केली नाही. हा कट असून परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे सिद्ध झालं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंड द्यावा, अशी मागणी निकम यांनी केली. तर आरोपींचे वकील एस. एस. आदास यांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली. एका आरोपीचं वय खूपच कमी आहे, तर अन्य आरोपीचं वय खूपच जास्त आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी. एड. चे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सहा जणांना शनिवारी २० जानेवारी रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. सोनई हत्याकांडाने रामायणातील राक्षसांची आठवण झाल्याचं सांगत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाले होते.
सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने १५ जानेवारी रोजी सहा जणांना दोषी ठरवले होते. या सहाही जणांना आज शिक्षा ठोठावण्यात येणार होती. त्यामुळे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम या सुनावणीला आज न्यायालयात हजर होते. संपूर्ण राज्याचे लक्षही या सुनावणीकडे लागले होते. न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाल्याने आता शनिवारी आरोपींना शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.
यावेळी निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १३ मुद्दे उपस्थित केले. आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली. तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं. ज्या पद्धतीने तुकडे करून खून केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला.
या हत्याकांडाचा आरोपींना कुठला पश्चाताप झालेला नाही, त्यांनी तशी भावना कोर्टात व्यक्त केली नाही. हा कट असून परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे सिद्ध झालं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंड द्यावा, अशी मागणी निकम यांनी केली. तर आरोपींचे वकील एस. एस. आदास यांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली. एका आरोपीचं वय खूपच कमी आहे, तर अन्य आरोपीचं वय खूपच जास्त आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी. एड. चे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.