गडावरील पाणीटंचाई होणार दूर
म. टा. वृत्तसेवा, कळवण
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडास पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाची गळती थांबवण्याच्या सर्व मेंटेनन्स कामाला रविवारी (दि. २६) पासून सुरुवात करण्यात आली. फेब्रुवारी २०१८ पासून या तलावाच्या मुख्य कामास प्रारंभ होणार असून, याबाबत भाविक व गड ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. या पाझर तलावाने गडावरील पाणीटंचाई पुढील वर्षांपासून दूर होण्यास मदत होऊ शकते.
कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडास भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाझर तलावाला गळती असल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जात आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावातील साठवण क्षमताही कमी झालेली आहे. गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दीबरोबर गडावरील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची गरजेपेक्षा पाण्याचा साठा कमी राहात असल्यामुळे उन्हाळा सुरू होताच गडावरील रहिवाशी व न्यासास दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परिणामी, या पाणीटंचाई काळात ग्रामस्थ, हॉटेल व्यावसासिकांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी भवानी तलावाची गळती थांबविणे, तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. त्यास त्यांना यश लाभून सरकारने २ कोटी ४९ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर करीत प्रशासकीय मान्यता दिली होती. सध्या भवानी तलाव तुडुंब भरलेला असून, किमान जानेवारी २०१८ पर्यंत सप्तशृंगी गडास पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सदर प्रस्तावित कामाची पाहाणी व मेंटेनन्स कामाच्या प्रारंभासाठी लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर. पी. धुम, अभियंता ए. व्ही. महाजन, ठेकेदार एम. डी. लोखंडे यांनी हजेरी लावली. या वेळी शांताराम सदगीर, ग्रामविकास अधिकारी जाधव उपस्थित होते.
म. टा. वृत्तसेवा, कळवण
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडास पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाची गळती थांबवण्याच्या सर्व मेंटेनन्स कामाला रविवारी (दि. २६) पासून सुरुवात करण्यात आली. फेब्रुवारी २०१८ पासून या तलावाच्या मुख्य कामास प्रारंभ होणार असून, याबाबत भाविक व गड ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. या पाझर तलावाने गडावरील पाणीटंचाई पुढील वर्षांपासून दूर होण्यास मदत होऊ शकते.
कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडास भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाझर तलावाला गळती असल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जात आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावातील साठवण क्षमताही कमी झालेली आहे. गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दीबरोबर गडावरील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची गरजेपेक्षा पाण्याचा साठा कमी राहात असल्यामुळे उन्हाळा सुरू होताच गडावरील रहिवाशी व न्यासास दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परिणामी, या पाणीटंचाई काळात ग्रामस्थ, हॉटेल व्यावसासिकांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी भवानी तलावाची गळती थांबविणे, तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. त्यास त्यांना यश लाभून सरकारने २ कोटी ४९ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर करीत प्रशासकीय मान्यता दिली होती. सध्या भवानी तलाव तुडुंब भरलेला असून, किमान जानेवारी २०१८ पर्यंत सप्तशृंगी गडास पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सदर प्रस्तावित कामाची पाहाणी व मेंटेनन्स कामाच्या प्रारंभासाठी लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर. पी. धुम, अभियंता ए. व्ही. महाजन, ठेकेदार एम. डी. लोखंडे यांनी हजेरी लावली. या वेळी शांताराम सदगीर, ग्रामविकास अधिकारी जाधव उपस्थित होते.