म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्याच्या बहुतांश भागाला तीव्र झळांनी भाजून काढणारी उष्णतेची लाट ओसरली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान पाच अंशांनी घसरून ३५ अंशावर, तर मालेगावचे तापमानही ४० अंशाच्या खाली आले आहे. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात नाशिकचे तापमान चाळीशी पार गेले होते. मालेगावचे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले होते. उष्णतेची ही लाट रविवारी ओसरली. विदर्भातही सर्वत्र पारा ४२ ते ४३ अंशांसह सामान्य झाला. अमरावती व बुलडाण्यात तर तो ३७ अंशांपर्यंत घसरला आहे. विशेष म्हणजे, वर्षापूर्वीदेखील पारा असाच सामान्य होऊन त्यादिवशी लाट ओसरली होती. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण व शुष्क वाऱ्यांमुळे आठवडाभरापासून उष्णतेची लाट होती.
तापमान स्थिर राहणार!
राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानात बदल होणार नाही, तर मुंबईत पुढील चोवीस तासांत आकाश ढगाळलेले राहिल. कोकण व गोव्यात उकाडा कायम राहिल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्याच्या बहुतांश भागाला तीव्र झळांनी भाजून काढणारी उष्णतेची लाट ओसरली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान पाच अंशांनी घसरून ३५ अंशावर, तर मालेगावचे तापमानही ४० अंशाच्या खाली आले आहे. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात नाशिकचे तापमान चाळीशी पार गेले होते. मालेगावचे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले होते. उष्णतेची ही लाट रविवारी ओसरली. विदर्भातही सर्वत्र पारा ४२ ते ४३ अंशांसह सामान्य झाला. अमरावती व बुलडाण्यात तर तो ३७ अंशांपर्यंत घसरला आहे. विशेष म्हणजे, वर्षापूर्वीदेखील पारा असाच सामान्य होऊन त्यादिवशी लाट ओसरली होती. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण व शुष्क वाऱ्यांमुळे आठवडाभरापासून उष्णतेची लाट होती.
तापमान स्थिर राहणार!
राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानात बदल होणार नाही, तर मुंबईत पुढील चोवीस तासांत आकाश ढगाळलेले राहिल. कोकण व गोव्यात उकाडा कायम राहिल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.