म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात एकीकडे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू असताना दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत अपयश आल्याने शैक्षणिक वर्षाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नाशिक विभागातू १२ हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेचा पहिला पेपर मंगळवारी दिला. भाषा विषयाच्या पहिल्या पेपरला नाशिक जिल्ह्यातून ७ हजार ३२५ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्यात १६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. दोन ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे उत्तीर्ण होऊन शैक्षणिक नुकसान टाळण्याची आणखी एक संधी यामुळे मिळाली आहे. नाशिक विभागातून या परीक्षेसाठी १२ हजार ५५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या दरम्यान बारावीचीही पुरवणी परीक्षा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातून १६ केंद्रांवर पहिल्या दिवशी सात हजार ३२५ विद्यार्थी, जळगाव जिल्ह्यातून १४ केंद्रांवर दोन हजार ९७२ विद्यार्थी, धुळे जिल्ह्यात पाच केंद्रांवर एक हजार २७ विद्यार्थी, नंदूरबारमध्ये दोन केंद्रांवर एक हजार २२९ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.
शहरात एकीकडे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू असताना दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत अपयश आल्याने शैक्षणिक वर्षाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नाशिक विभागातू १२ हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेचा पहिला पेपर मंगळवारी दिला. भाषा विषयाच्या पहिल्या पेपरला नाशिक जिल्ह्यातून ७ हजार ३२५ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्यात १६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. दोन ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे उत्तीर्ण होऊन शैक्षणिक नुकसान टाळण्याची आणखी एक संधी यामुळे मिळाली आहे. नाशिक विभागातून या परीक्षेसाठी १२ हजार ५५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या दरम्यान बारावीचीही पुरवणी परीक्षा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातून १६ केंद्रांवर पहिल्या दिवशी सात हजार ३२५ विद्यार्थी, जळगाव जिल्ह्यातून १४ केंद्रांवर दोन हजार ९७२ विद्यार्थी, धुळे जिल्ह्यात पाच केंद्रांवर एक हजार २७ विद्यार्थी, नंदूरबारमध्ये दोन केंद्रांवर एक हजार २२९ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.