मेंदू हा सर्वात रहस्यमय अवयव
मेंदू हा शरीरातील इतर सर्व अवयवांपेक्षा अतिशय रहस्यमय अवयव आहे. मेंदूची रचना सारखी असली तरी प्रत्येकाच्या मेंदूचे कार्य वेगळ आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांची संख्या वाढली असून विसरभोळेपणा हा त्यातील एक आजार समोर येत आहे. मेंदू निरोगी नसण्याचे हे लक्षण असून शरीराचा हा भाग निरोगी ठेवण्यासाठी आपण योग्य वेळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेंदू व मज्जारज्जू शल्यविशेषज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी केले.
Maharashtra Times 22 Feb 2018, 4:00 am
डॉ. महेश करंदीकर यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मेंदू हा शरीरातील इतर सर्व अवयवांपेक्षा अतिशय रहस्यमय अवयव आहे. मेंदूची रचना सारखी असली तरी प्रत्येकाच्या मेंदूचे कार्य वेगळ आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांची संख्या वाढली असून विसरभोळेपणा हा त्यातील एक आजार समोर येत आहे. मेंदू निरोगी नसण्याचे हे लक्षण असून शरीराचा हा भाग निरोगी ठेवण्यासाठी आपण योग्य वेळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेंदू व मज्जारज्जू शल्यविशेषज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी केले.
मेमरी क्लब संस्थेतर्फे 'मानवी मेंदू - रहस्य आणि आरोग्य' या विषयावर डॉ. महेश करंदीकर यांचे शंकराचार्य संकुल येथील नानासाहेब ढोबळे सभागृहात व्याख्यान झाले. मेंदूची रचना ही लहान मेंदू व मोठा मेंदू अशी असते. मेंदूचा डावा भाग हा बौद्धिक, निर्णय क्षमता या बाबी तर उजवा भाग हा मन, भावनिक, कला, चिंता या बाबी सांभाळत असतो. या दोन भागांमधील असंतुलन आजारांचे मुख्य कारण ठरत असते. अर्धशिशी हा आजारही या असंतुलनामुळे होत असल्याने दोहोंमधील सुवर्णमध्य साधणे आवश्यक आहे. आजकाल तरुणांमध्ये अस्थिर मनामुळे अनेक मोठमोठे आजार होत आहेत. अस्थिर मनामुळे प्रतिकार करणाऱ्या पेशींवरही परिणाम होत असून कॅन्सरसारखे गंभीर आजारही अगदी सहजतेने बळावत आहेत, असे डॉ. करंदीकर यांनी सांगितले.
आपली छोटछोट्या गोष्टींमध्ये चिडचिड होत असेल, शरिरात सगळीकडे दुखणं, कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही ही भावना, कशातच मन न रमणे, उगाचच थकवा, बैचेनी, उदास वाटत असेल तर हे आजारी मेंदूचे लक्षण आहे. मेंदूला निरोगी बनवण्यासाठी त्याची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. यामध्ये मन शांत करणे, योगा, व्यायाम, चांगला आहार, हासणे, छंदांची जोपासणा, वर्तमानात जगणे अशा गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच उलटं चालणे, डाव्या हाताची कामे उजव्या हाताने व उजव्या हाताची कामे डाव्या हाताने करणे, पेपर उलटा धरून वाचण्याचा प्रयत्न करणे अशा मेमरी गेम्सचाही सुदृढ मेंदूसाठी फायदा होत असल्याने या बाबी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिल्या. रागिणी किणीकर यांनी प्रास्ताविक केले. संजिवनी कुलकर्णी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मेंदू हा शरीरातील इतर सर्व अवयवांपेक्षा अतिशय रहस्यमय अवयव आहे. मेंदूची रचना सारखी असली तरी प्रत्येकाच्या मेंदूचे कार्य वेगळ आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांची संख्या वाढली असून विसरभोळेपणा हा त्यातील एक आजार समोर येत आहे. मेंदू निरोगी नसण्याचे हे लक्षण असून शरीराचा हा भाग निरोगी ठेवण्यासाठी आपण योग्य वेळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेंदू व मज्जारज्जू शल्यविशेषज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी केले.
मेमरी क्लब संस्थेतर्फे 'मानवी मेंदू - रहस्य आणि आरोग्य' या विषयावर डॉ. महेश करंदीकर यांचे शंकराचार्य संकुल येथील नानासाहेब ढोबळे सभागृहात व्याख्यान झाले. मेंदूची रचना ही लहान मेंदू व मोठा मेंदू अशी असते. मेंदूचा डावा भाग हा बौद्धिक, निर्णय क्षमता या बाबी तर उजवा भाग हा मन, भावनिक, कला, चिंता या बाबी सांभाळत असतो. या दोन भागांमधील असंतुलन आजारांचे मुख्य कारण ठरत असते. अर्धशिशी हा आजारही या असंतुलनामुळे होत असल्याने दोहोंमधील सुवर्णमध्य साधणे आवश्यक आहे. आजकाल तरुणांमध्ये अस्थिर मनामुळे अनेक मोठमोठे आजार होत आहेत. अस्थिर मनामुळे प्रतिकार करणाऱ्या पेशींवरही परिणाम होत असून कॅन्सरसारखे गंभीर आजारही अगदी सहजतेने बळावत आहेत, असे डॉ. करंदीकर यांनी सांगितले.
आपली छोटछोट्या गोष्टींमध्ये चिडचिड होत असेल, शरिरात सगळीकडे दुखणं, कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही ही भावना, कशातच मन न रमणे, उगाचच थकवा, बैचेनी, उदास वाटत असेल तर हे आजारी मेंदूचे लक्षण आहे. मेंदूला निरोगी बनवण्यासाठी त्याची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. यामध्ये मन शांत करणे, योगा, व्यायाम, चांगला आहार, हासणे, छंदांची जोपासणा, वर्तमानात जगणे अशा गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच उलटं चालणे, डाव्या हाताची कामे उजव्या हाताने व उजव्या हाताची कामे डाव्या हाताने करणे, पेपर उलटा धरून वाचण्याचा प्रयत्न करणे अशा मेमरी गेम्सचाही सुदृढ मेंदूसाठी फायदा होत असल्याने या बाबी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिल्या. रागिणी किणीकर यांनी प्रास्ताविक केले. संजिवनी कुलकर्णी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.