म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्पः आगामी विधानसभा निवडणुकीत युती होवो अथवा ना होवो, मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी येथे केला. देवळाली विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र-बुथ प्रमुख-पेज प्रमुख यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अहिर म्हणाले, की कधी काळी दोन खासदार असलेल्या भाजपचे आता ३०२ खासदार झाले आहेत. तीनवेळा अटलजी, तर दोनवेळा मोदीजी पंतप्रधान झाले. या मागे पक्ष संघटनेची ताकद असून, काँग्रेस नेमकी यातच कमी पडली असल्याचा टोला त्यांनी दिला. देशाला मजबूत व सक्षम सरकार देणे ही आपली जबाबदारी असून, त्यासाठी संघटनेतील शेवटच्या घटकाला महत्त्व देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी बुथ प्रमुखांचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यात युतीची चर्चा असली तरी पक्षाचा निर्णय सर्वांना शिरसावंद्य असेल. देवळाली मतदारसंघ मित्र पक्षाकडे असला तरी भाजपची तयारी पूर्ण झाल्याचा दावाही अहिर यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सचिन ठाकरे, बापू पाटील, सरोज आहेर यांचे भाषण झाले. व्यासपीठावर भगवान कटारिया, बाबूराव मोजाड आदी उपस्थित होते.
अहिर म्हणाले, की कधी काळी दोन खासदार असलेल्या भाजपचे आता ३०२ खासदार झाले आहेत. तीनवेळा अटलजी, तर दोनवेळा मोदीजी पंतप्रधान झाले. या मागे पक्ष संघटनेची ताकद असून, काँग्रेस नेमकी यातच कमी पडली असल्याचा टोला त्यांनी दिला. देशाला मजबूत व सक्षम सरकार देणे ही आपली जबाबदारी असून, त्यासाठी संघटनेतील शेवटच्या घटकाला महत्त्व देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी बुथ प्रमुखांचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यात युतीची चर्चा असली तरी पक्षाचा निर्णय सर्वांना शिरसावंद्य असेल. देवळाली मतदारसंघ मित्र पक्षाकडे असला तरी भाजपची तयारी पूर्ण झाल्याचा दावाही अहिर यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सचिन ठाकरे, बापू पाटील, सरोज आहेर यांचे भाषण झाले. व्यासपीठावर भगवान कटारिया, बाबूराव मोजाड आदी उपस्थित होते.