म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रिक्षामध्ये सोन्याचे तब्बल सहा तोळे दागिने विसरल्याने सैरभैर झालेल्या वृद्ध महिलेला मुंबई नाका पोलिसांनी दिलासा दिला. रिक्षाचालकाबाबत कोणतीही माहिती नसताना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्या घरून तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. दागिने परत मिळतील अशी आशा नसतानाही १५ दिवसांत दागिने हाती मिळाल्याने ही वृद्धा सुखावली आहे.
गंजमाळ परिसरातील सर्वोदयनगरमध्ये राहणाऱ्या सुमतीलाल अमृतलाल शहा (वय ८४) या वृद्धा दोन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता महामार्ग बस स्थानकात जाण्यासाठी रिक्षाने निघाल्या. त्यांच्यासमवेत बॅगमध्ये साडेसहा तोळे वजनाचे एक लाख ९२ हजार रुपयांचे दागिने होते. ही बॅग त्या रिक्षामध्येच विसरल्या. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच त्या सैरभैर झाल्या. रिक्षाचालकाचा शोध घेऊ लागल्या. परंतु, तो भेटू शकला नाही. अखेर त्यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे यांची भेट घेतली. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सोनोने यांसह पोलिस कर्मचारी एन. व्ही. लिलके, वाय. पी. गायकवाड, वाय. एस. लोंढे, एस. पी. मुंजाळ यांनी संबंधित रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. शहा ज्या मार्गाने रिक्षातून आल्या त्या मार्गावरील त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे पोलिसांना रिक्षाचा नंबर मिळू शकला. अब्बास साबीर सैय्यद याची ही रिक्षा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. शहा यांचे नाव, घरचा पत्ता माहीत नसल्याने बॅग घरी सांभाळून ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेऊन मंगळवारी शहा यांच्याकडे सुपूर्द केली. दागिने परत मिळाल्याने शहा यांनी पोलिसांचे आभार मानले.
रिक्षामध्ये सोन्याचे तब्बल सहा तोळे दागिने विसरल्याने सैरभैर झालेल्या वृद्ध महिलेला मुंबई नाका पोलिसांनी दिलासा दिला. रिक्षाचालकाबाबत कोणतीही माहिती नसताना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्या घरून तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. दागिने परत मिळतील अशी आशा नसतानाही १५ दिवसांत दागिने हाती मिळाल्याने ही वृद्धा सुखावली आहे.
गंजमाळ परिसरातील सर्वोदयनगरमध्ये राहणाऱ्या सुमतीलाल अमृतलाल शहा (वय ८४) या वृद्धा दोन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता महामार्ग बस स्थानकात जाण्यासाठी रिक्षाने निघाल्या. त्यांच्यासमवेत बॅगमध्ये साडेसहा तोळे वजनाचे एक लाख ९२ हजार रुपयांचे दागिने होते. ही बॅग त्या रिक्षामध्येच विसरल्या. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच त्या सैरभैर झाल्या. रिक्षाचालकाचा शोध घेऊ लागल्या. परंतु, तो भेटू शकला नाही. अखेर त्यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे यांची भेट घेतली. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सोनोने यांसह पोलिस कर्मचारी एन. व्ही. लिलके, वाय. पी. गायकवाड, वाय. एस. लोंढे, एस. पी. मुंजाळ यांनी संबंधित रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. शहा ज्या मार्गाने रिक्षातून आल्या त्या मार्गावरील त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे पोलिसांना रिक्षाचा नंबर मिळू शकला. अब्बास साबीर सैय्यद याची ही रिक्षा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. शहा यांचे नाव, घरचा पत्ता माहीत नसल्याने बॅग घरी सांभाळून ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेऊन मंगळवारी शहा यांच्याकडे सुपूर्द केली. दागिने परत मिळाल्याने शहा यांनी पोलिसांचे आभार मानले.