नाशिकरोड : अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण विभागातर्फे १८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यांचे अकरावीचे प्रवेश झालेले नसतील अशा विद्यार्थ्यांनी नव्याने दिलेल्या मुदतीत शिक्षण उपसंचालक कार्यालयात कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक विभागाच्या शिक्षण सहाय्यक उपसंचालक पुष्पा पाटील यांनी केले आहे. २०१९-२० साठी राबविण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत एक बायफोकल फेरी, नियमित तीन फेऱ्या, विशेष एक फेरी तर 'एफसीएफएस'च्या तीन फेऱ्या आठ फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. तरीही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सोय करण्यात आलेली आहे.
अकरावी प्रवेशास मुदतवाढ
अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण विभागातर्फे १८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2019, 4:00 am