अ‍ॅपशहर

मूलभूत शिक्षणाचा प्रसारच नाही

राज्यातील काही मुठभर शिक्षकांच्या कामातील दिरंगाई महाराष्ट्र ‘प्रगत’ होण्यापासून वंचित ठेवत आहे. राज्यातून साधारण ६५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत मूलभूत शिक्षण पोहचविणे अजूनही शिक्षकांना जमलेले नाही, असे खडे बोल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षकांना सुनावले.

Maharashtra Times 22 Apr 2017, 4:00 am
राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत प्रधान सचिव नंदकुमार यांचे शिक्षकांना खडे बोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम there is no propaganda of basic education
मूलभूत शिक्षणाचा प्रसारच नाही


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील काही मुठभर शिक्षकांच्या कामातील दिरंगाई महाराष्ट्र ‘प्रगत’ होण्यापासून वंचित ठेवत आहे. राज्यातून साधारण ६५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत मूलभूत शिक्षण पोहचविणे अजूनही शिक्षकांना जमलेले नाही, असे खडे बोल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षकांना सुनावले.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य व संदीप विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची व इंग्रजी, गणित व विज्ञान शिक्षकांची एक दिवसीय ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ (माध्यमिक स्तर) राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. संदीप फाऊंडेशन येथे शुक्रवारी (दि. २१) ही परिषद पार पडली. या परिषदेचे उद््घाटनप्रसंगी नंदकुमार बोलत होते.

ते म्हणाले की, आधुनिकीकरणाला जाणून घेणारा आणि अंगीकृत करणारा विद्यार्थी घडवणे काळाची गरज आहे. आपल्या विषयाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये ‘माणुसकी’ रूजविणे हेदेखील शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. तसेच आयएसओ दर्जा प्राप्त करण्याचा दृष्टीने नाशिक विभागीय कार्यालयाच्या कामाच्या गुणवत्तेची प्रशंसा त्यांनी यावेळी केली.

शिक्षण संचालक नामदेव जरग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य अनन्यसाधारण असल्याचे ते म्हणाले. आजचा विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात मागे पडू नये यासाठी सरकारने जो पुढाकार घेतला आहे त्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. शिक्षकांच्या कार्यक्षमतेस वाव देण्याच्या उद्देशाने पहिला आदेश जून २०१५ साली सादर करत त्यानुसार प्राथमिक शिक्षकांना खऱ्या अर्थाने शैक्षणिक स्वातंत्र्य देण्यात आल्याचेही ते म्हणाले. या आदेशांतर्गत ‘आधी केले मग सांगितले’ या उपरोक्तीला सत्य करणारे अनेक होतकरू शिक्षक उदयास आल्याचे संपूर्ण राज्यात पहावयास मिळाले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गळती शून्य संदेश गावोगावीच्या शाळांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले.

संदीप फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. संदीपकुमार झा यांनी फाऊंडेशन आणि संदीप विद्यापीठाची सामाजिक व शैक्षणिक वाटचाल तसेच शिक्षकांचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिमा मान व प्रा. योगेश अदमाने यांनी केले. यावेळी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, संदीप विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. डी. डी. देशमुख, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज