म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक शहरात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक विविध योजना अंमलात आणल्या आहेत. तरीदेखील सातपूर भागात भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने सातपूरकर त्रस्त झाले आहेत. गेल्याच महिन्यात सावकरनगर भागात दुचाकींच्या चोरी व घरफोडी झाल्याने नगरसेविका पल्लवी पाटील यांनी पोलिसांना निवेदन देत चोरट्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
सातपूर परिसरातील काही भागांत दुचाकींचे पेट्रोल चोरी करणारीही टोळी सक्रिय झाली असून, कामगारांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागातील रहिवाशी भयभीत झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अंबड-लिंकरोडवरील केवलपार्क येथील तुळजाभवानी देवीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पसार केले आहेत. नेहमीच चोरीच्या घटना होत असल्याने पोलिस आयुक्तांनी अंबड-लिंकरोडवर पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा
कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरू असताना दुचाकी व मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. सातपूर कॉलनीत घरफोड्यांसह दुचाकी चोरीला जात असल्याने पोलिसांना मात्र चोरट्यांचा सुगावाच लागत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सातपूर भागातील धृवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, सावरकरनगर, जाधव संकुल, जाधव टाऊनशिप, अंबड-लिंकरोडवर सर्वाधित भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
देवीचे दागिनेही लंपास
भुरट्या चोरांकडून मिळेल ती वस्तू लंपास करण्याचे काम होत असल्याने कामगार वस्तीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या गरजेच्या वस्तू चोरीला जात असल्याने पोलिसांनी याकडे द्यावे. तसेच या भुरट्या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. सातपूर कॉलनीत घरफोडीचे सत्र सुरू असताना अंबड-लिंकरोडवर पहिल्यांदाच केवल पार्क येथील तुळजाभवानी मंदिरात देवीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. देवी मंदिरात पहिल्यांदाच चोरी झाल्याने परिसरातील महिलांनी नाराजी व्यक्त करत पोलिस चौकी उभारण्याची मागणी केली आहे. चोऱ्यांची वाढती संख्या बघता पोलिस आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
सातपूरच्या कामगार नगरीत गेल्या काही महिन्यांपासून भुरट्या चोरांमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. दुचाकी व घरफोडीचे सत्र सुरू असतांना आता मंदिरांना देखील चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. अंबड-लिंकरोडवर पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र पोलिस चौकी उभारली पाहिजे.
गोरख घाटोळ, रहिवाशी
नाशिक शहरात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक विविध योजना अंमलात आणल्या आहेत. तरीदेखील सातपूर भागात भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने सातपूरकर त्रस्त झाले आहेत. गेल्याच महिन्यात सावकरनगर भागात दुचाकींच्या चोरी व घरफोडी झाल्याने नगरसेविका पल्लवी पाटील यांनी पोलिसांना निवेदन देत चोरट्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
सातपूर परिसरातील काही भागांत दुचाकींचे पेट्रोल चोरी करणारीही टोळी सक्रिय झाली असून, कामगारांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागातील रहिवाशी भयभीत झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अंबड-लिंकरोडवरील केवलपार्क येथील तुळजाभवानी देवीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पसार केले आहेत. नेहमीच चोरीच्या घटना होत असल्याने पोलिस आयुक्तांनी अंबड-लिंकरोडवर पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा
कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरू असताना दुचाकी व मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. सातपूर कॉलनीत घरफोड्यांसह दुचाकी चोरीला जात असल्याने पोलिसांना मात्र चोरट्यांचा सुगावाच लागत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सातपूर भागातील धृवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, सावरकरनगर, जाधव संकुल, जाधव टाऊनशिप, अंबड-लिंकरोडवर सर्वाधित भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
देवीचे दागिनेही लंपास
भुरट्या चोरांकडून मिळेल ती वस्तू लंपास करण्याचे काम होत असल्याने कामगार वस्तीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या गरजेच्या वस्तू चोरीला जात असल्याने पोलिसांनी याकडे द्यावे. तसेच या भुरट्या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. सातपूर कॉलनीत घरफोडीचे सत्र सुरू असताना अंबड-लिंकरोडवर पहिल्यांदाच केवल पार्क येथील तुळजाभवानी मंदिरात देवीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. देवी मंदिरात पहिल्यांदाच चोरी झाल्याने परिसरातील महिलांनी नाराजी व्यक्त करत पोलिस चौकी उभारण्याची मागणी केली आहे. चोऱ्यांची वाढती संख्या बघता पोलिस आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
सातपूरच्या कामगार नगरीत गेल्या काही महिन्यांपासून भुरट्या चोरांमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. दुचाकी व घरफोडीचे सत्र सुरू असतांना आता मंदिरांना देखील चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. अंबड-लिंकरोडवर पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र पोलिस चौकी उभारली पाहिजे.
गोरख घाटोळ, रहिवाशी