मालेगाव:
नापिकी, शेतमालाला भाव नसणे, कर्जबाजारीपणा या कारणांनी शुक्रवारी मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन तरुण शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. कंधाणे, सायने खु. व नांदगाव बु. येथे या घटना घडल्या. दर नसल्याने कंधाणेच्या शेतकऱ्याने तर कांद्याच्या राशीवरच विष प्राशन करून आत्महत्या केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच या तीन दुर्दैवी घटना घडल्या असून, एकूणच शेती आणि शेतकरी प्रश्न जटील बनत चालला आहे.
मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कंधाणे येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेवणकर (वय ३५) यांनी शुक्रवारी याच कारणामुळे आपली जीवनयात्रा संपवली. शेवणकर हे एकत्र कुटुंबात राहत होते. सहा एकर कोरडवाहू शेतीक्षेत्र असलेल्या शेवणकर यांच्यावर सोसायटीचे दीड लाख, तर हातउसनवारीचे दीड लाख असे तीन लाख कर्ज होते. दर वाढल्यावर कांदा विक्री करू या आशेने शेवणकर यांनी शेतात कांद्याची ढिग केला होता. शुक्रवारी सकाळी याच कांद्याजवळ त्यांनी विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ज्योती देवरे, बाजार समिती उपसभापती सुनील देवरे, तालुका पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. शेवणकर यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, आईवडील असा परिवार आहे.
सायने येथील शेतकरी वसंत बंकट पाटील (वय ४५) यांनीदेखील गुरुवारी आपल्या शेतातील घरात सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या नावे ०.८५ आर शेती असून, सोसायटीचे दीड लाखाचे कर्ज होते. शेतीमालास भाव नसल्याने व कर्जबाजारीपणामुळे नैराश्येतून त्यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जाते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
नांदगाव बु. येथील चेतन केदा बच्छाव (वय २३) या तरुण शेतकऱ्याने देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे ०.०४ आर शेती असून, त्यांच्यावर सोसायटीचे ६५ हजार, तर एका खासगी कंपनीचे पाच लाख कर्ज होते. चेतन हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई वडील व दोन अविवाहित बहिणी असा परिवार आहे.
वर्ष शेतकरी आत्महत्या
२०१४ ४६
२०१५ ८५
२०१६ ८७
२०१७ १०४
२०१८ १०८
२०१९ ०३
नापिकी, शेतमालाला भाव नसणे, कर्जबाजारीपणा या कारणांनी शुक्रवारी मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन तरुण शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. कंधाणे, सायने खु. व नांदगाव बु. येथे या घटना घडल्या. दर नसल्याने कंधाणेच्या शेतकऱ्याने तर कांद्याच्या राशीवरच विष प्राशन करून आत्महत्या केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच या तीन दुर्दैवी घटना घडल्या असून, एकूणच शेती आणि शेतकरी प्रश्न जटील बनत चालला आहे.
मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कंधाणे येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेवणकर (वय ३५) यांनी शुक्रवारी याच कारणामुळे आपली जीवनयात्रा संपवली. शेवणकर हे एकत्र कुटुंबात राहत होते. सहा एकर कोरडवाहू शेतीक्षेत्र असलेल्या शेवणकर यांच्यावर सोसायटीचे दीड लाख, तर हातउसनवारीचे दीड लाख असे तीन लाख कर्ज होते. दर वाढल्यावर कांदा विक्री करू या आशेने शेवणकर यांनी शेतात कांद्याची ढिग केला होता. शुक्रवारी सकाळी याच कांद्याजवळ त्यांनी विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ज्योती देवरे, बाजार समिती उपसभापती सुनील देवरे, तालुका पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. शेवणकर यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, आईवडील असा परिवार आहे.
सायने येथील शेतकरी वसंत बंकट पाटील (वय ४५) यांनीदेखील गुरुवारी आपल्या शेतातील घरात सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या नावे ०.८५ आर शेती असून, सोसायटीचे दीड लाखाचे कर्ज होते. शेतीमालास भाव नसल्याने व कर्जबाजारीपणामुळे नैराश्येतून त्यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जाते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
नांदगाव बु. येथील चेतन केदा बच्छाव (वय २३) या तरुण शेतकऱ्याने देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे ०.०४ आर शेती असून, त्यांच्यावर सोसायटीचे ६५ हजार, तर एका खासगी कंपनीचे पाच लाख कर्ज होते. चेतन हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई वडील व दोन अविवाहित बहिणी असा परिवार आहे.
वर्ष शेतकरी आत्महत्या
२०१४ ४६
२०१५ ८५
२०१६ ८७
२०१७ १०४
२०१८ १०८
२०१९ ०३