म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
निसर्ग सौंदर्याचे भरभरून वरदान लाभलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये टुरिझम सर्किट विकसित करणे शक्य असून, यासाठीची प्राथमिक पाहणी बुधवारी करण्यात आली. या प्रकल्पात पर्यटकांसाठी सायकलिंगसह अनेकविध पर्याय खुले करून देतानाच स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार असल्याने हा परिसर 'टुरिझम डेस्टिनेशन' म्हणून पुढे येऊ शकणार आहे.
स्वच्छ हवा, हिरवाई, डोंगरांवरून कोसळणारे शुभ्र धबधबे न्याहाळत धरणांच्या काठाकाठाने फिरण्याची मज्जाच काही वेगळीच आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भागाला अशा निसर्गमय वातावरणाचे वरदान लाभले आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातील नव्हे ,तर राज्यभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक निसर्गसुंदर ठिकाणे, धार्मिक स्थळे या परिसरात असल्याने येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही लक्ष पुरविले आहे. इगतपुरीतील घोटी रस्त्यावरील आवळी दुमाला ते त्र्यंबकेश्वरमधील पहिने गावापर्यंतच्या २० किलोमीटर परिसरात पर्यटकांसाठी कोणत्या बाबींची उभारणी करता येईल, याचा अंदाज पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला. यावेळी पर्यटनचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी राहुल पाटील, इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे, वन विभाग, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आवळी दुमाला ते पहिने मार्गावर वैतरणा, मुकणे आणि वाकी ही धरणे आहेत. शिवाय, चारही बाजूने डोंगर असल्याने त्यावरून वाहाणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळेच या भागात पर्यटकांची वर्दळ असते. या भागात पर्यटकांना विविध सुविधा देऊन हा परिसर टुरिझम सर्किट म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पुढाकार घेतला आहे. वॉटरस्पोर्ट, इतर साहसी क्रीडा प्रकार, रोप क्लायबिंग, ट्रेकींगसाठी विशेष सुविधा, सायकलींग यासारख्या सुविधा येथे उपलब्ध करून देता येतील का याचा आढावा सिंगल यांनी घेतला.
निसर्ग सौंदर्याचे भरभरून वरदान लाभलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये टुरिझम सर्किट विकसित करणे शक्य असून, यासाठीची प्राथमिक पाहणी बुधवारी करण्यात आली. या प्रकल्पात पर्यटकांसाठी सायकलिंगसह अनेकविध पर्याय खुले करून देतानाच स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार असल्याने हा परिसर 'टुरिझम डेस्टिनेशन' म्हणून पुढे येऊ शकणार आहे.
स्वच्छ हवा, हिरवाई, डोंगरांवरून कोसळणारे शुभ्र धबधबे न्याहाळत धरणांच्या काठाकाठाने फिरण्याची मज्जाच काही वेगळीच आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भागाला अशा निसर्गमय वातावरणाचे वरदान लाभले आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातील नव्हे ,तर राज्यभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक निसर्गसुंदर ठिकाणे, धार्मिक स्थळे या परिसरात असल्याने येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही लक्ष पुरविले आहे. इगतपुरीतील घोटी रस्त्यावरील आवळी दुमाला ते त्र्यंबकेश्वरमधील पहिने गावापर्यंतच्या २० किलोमीटर परिसरात पर्यटकांसाठी कोणत्या बाबींची उभारणी करता येईल, याचा अंदाज पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला. यावेळी पर्यटनचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी राहुल पाटील, इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे, वन विभाग, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आवळी दुमाला ते पहिने मार्गावर वैतरणा, मुकणे आणि वाकी ही धरणे आहेत. शिवाय, चारही बाजूने डोंगर असल्याने त्यावरून वाहाणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळेच या भागात पर्यटकांची वर्दळ असते. या भागात पर्यटकांना विविध सुविधा देऊन हा परिसर टुरिझम सर्किट म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पुढाकार घेतला आहे. वॉटरस्पोर्ट, इतर साहसी क्रीडा प्रकार, रोप क्लायबिंग, ट्रेकींगसाठी विशेष सुविधा, सायकलींग यासारख्या सुविधा येथे उपलब्ध करून देता येतील का याचा आढावा सिंगल यांनी घेतला.