म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहराची बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेन रोड, तसेच रविवार कारंजा या भागात आज, रविवारी खरेदीदारांची तुफान गर्दी झाली. अत्यंत चिंचोळ्या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले, तर उर्वरित जागा दुचाकी, रिक्षा व चारचाकींनी व्यापली. नागरिकांना चालायला जागा नसताना अतिक्रमण व वाहनांच्या गर्दीने सर्वांची तारंबळ उडाली.
स्वस्त आणि मस्त अशी ओळख असलेल्या मेन रोड भागात शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील खरेदीदार आकृष्ट होतात. विशेषतः सणांच्या पार्श्वभूमीवर काही तासांत येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. दिवाळीपूर्वीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने खरेदीदारांनी तुफान गर्दी केली. मात्र, खरेदीदारांच्या गर्दीत वाहनांचा मेळा भरला. दुचाकी, रिक्षा इतकेच नव्हे, तर चारचाकी वाहनेही शालिमार, मेन रोड भागात फिरताना दिसली. वाहनांसाठी कुठेही अटकाव नसल्याने रस्त्यावर चालतानाही अवघड झाले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांची संख्या लक्षणीय वाढली असून, त्यातील बहुतांश विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विक्रेत्यांनी थेट रस्ताच अडवल्याने चालण्यासाठी किंवा वाहनांसाठी रस्ताच अपुरा पडला.
नियोजनाकडे दुर्लक्ष
गर्दीमुळे एमजी रोड, तसेच एमजी रोडकडून शालिमारकडे येणाऱ्या वाहनांना कोंडीला सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली असताना पोलिस, तसेच महापालिकेकडून मात्र कोणतेही नियोजन झाले नाही. गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांना विविध मॉलचा पर्याय निवडावा लागला.
२६ रोजी जम्बो बैठक
वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केवळ नियम बनवणे फायद्याचे नाही. लोकसहभागातूनच ही व्यवस्था सुरळीत होऊ शकते, अशा निष्कर्षापर्यंत शहर वाहतूक पोलिस पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात जम्बो बैठक होणार असून, बैठकीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सर्वसामान्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शहरातील बहुतांश भागातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. जुने नाशिक किंवा पंचवटी भागात रस्त्यांचे रुंदीकरण करणेही शक्य नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल होणे अपेक्षित आहे. अनेकदा पोलिस सायलेन्स झोन, नो एंट्री, वेगमर्यादा असे नियम तयार करून घेतात. महापालिका यथावकाश तिथे त्याबाबतचे फलक लावते. मात्र, या खटाटोपाचा तितका फायदा होताना दिसत नाही. एक तर या नियमांची नागरिकांना माहिती नसते किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे मत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी व्यक्त केले. याच दृष्टीने बुधवारी, २६ ऑक्टोबर रोजी रावसाहेब थोरात सभागृहात बैठक होणार आहे. बैठकीस खासदार, आमदार, नगरसेवक, मेडिकल असोसिएशन, मार्केट कमिटीचे पदाधिकारी, मनपा, आरटीओ, निमा, हायवे पोलिस, शालेय स्कूल बस चालक, रिक्षा, टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, लायन्स क्लब व इतर सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, हॉकर्स युनियन, जॉगर्स क्लब सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवाशी संघटना, लॉन्स असोसिएशन, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, मॅरेथॉन आयोजन आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिस आयुक्त सिंघल यांनी सांगितले, की शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, असे प्रत्येकाला वाटते. याचसाठी ही बैठक होणार आहे. वन वे रस्ते करणे, सिग्नल बसवणे, डिव्हायडर असावा किंवा नसावा, स्पीड ब्रेकर, पार्किंग असे अनेक प्रश्न आहेत. याबाबत नागरिकांना काय वाटते हे महत्वाचे असून, त्या दृष्टीने बैठकीत चर्चा होईल. नागरिकांकडून आलेल्या सूचना आणि हरकतीनुसार पोलिस कार्यवाही करतील, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.
शहराची बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेन रोड, तसेच रविवार कारंजा या भागात आज, रविवारी खरेदीदारांची तुफान गर्दी झाली. अत्यंत चिंचोळ्या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले, तर उर्वरित जागा दुचाकी, रिक्षा व चारचाकींनी व्यापली. नागरिकांना चालायला जागा नसताना अतिक्रमण व वाहनांच्या गर्दीने सर्वांची तारंबळ उडाली.
स्वस्त आणि मस्त अशी ओळख असलेल्या मेन रोड भागात शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील खरेदीदार आकृष्ट होतात. विशेषतः सणांच्या पार्श्वभूमीवर काही तासांत येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. दिवाळीपूर्वीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने खरेदीदारांनी तुफान गर्दी केली. मात्र, खरेदीदारांच्या गर्दीत वाहनांचा मेळा भरला. दुचाकी, रिक्षा इतकेच नव्हे, तर चारचाकी वाहनेही शालिमार, मेन रोड भागात फिरताना दिसली. वाहनांसाठी कुठेही अटकाव नसल्याने रस्त्यावर चालतानाही अवघड झाले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांची संख्या लक्षणीय वाढली असून, त्यातील बहुतांश विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विक्रेत्यांनी थेट रस्ताच अडवल्याने चालण्यासाठी किंवा वाहनांसाठी रस्ताच अपुरा पडला.
नियोजनाकडे दुर्लक्ष
गर्दीमुळे एमजी रोड, तसेच एमजी रोडकडून शालिमारकडे येणाऱ्या वाहनांना कोंडीला सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली असताना पोलिस, तसेच महापालिकेकडून मात्र कोणतेही नियोजन झाले नाही. गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांना विविध मॉलचा पर्याय निवडावा लागला.
२६ रोजी जम्बो बैठक
वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केवळ नियम बनवणे फायद्याचे नाही. लोकसहभागातूनच ही व्यवस्था सुरळीत होऊ शकते, अशा निष्कर्षापर्यंत शहर वाहतूक पोलिस पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात जम्बो बैठक होणार असून, बैठकीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सर्वसामान्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शहरातील बहुतांश भागातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. जुने नाशिक किंवा पंचवटी भागात रस्त्यांचे रुंदीकरण करणेही शक्य नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल होणे अपेक्षित आहे. अनेकदा पोलिस सायलेन्स झोन, नो एंट्री, वेगमर्यादा असे नियम तयार करून घेतात. महापालिका यथावकाश तिथे त्याबाबतचे फलक लावते. मात्र, या खटाटोपाचा तितका फायदा होताना दिसत नाही. एक तर या नियमांची नागरिकांना माहिती नसते किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे मत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी व्यक्त केले. याच दृष्टीने बुधवारी, २६ ऑक्टोबर रोजी रावसाहेब थोरात सभागृहात बैठक होणार आहे. बैठकीस खासदार, आमदार, नगरसेवक, मेडिकल असोसिएशन, मार्केट कमिटीचे पदाधिकारी, मनपा, आरटीओ, निमा, हायवे पोलिस, शालेय स्कूल बस चालक, रिक्षा, टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, लायन्स क्लब व इतर सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, हॉकर्स युनियन, जॉगर्स क्लब सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवाशी संघटना, लॉन्स असोसिएशन, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, मॅरेथॉन आयोजन आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिस आयुक्त सिंघल यांनी सांगितले, की शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, असे प्रत्येकाला वाटते. याचसाठी ही बैठक होणार आहे. वन वे रस्ते करणे, सिग्नल बसवणे, डिव्हायडर असावा किंवा नसावा, स्पीड ब्रेकर, पार्किंग असे अनेक प्रश्न आहेत. याबाबत नागरिकांना काय वाटते हे महत्वाचे असून, त्या दृष्टीने बैठकीत चर्चा होईल. नागरिकांकडून आलेल्या सूचना आणि हरकतीनुसार पोलिस कार्यवाही करतील, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.