म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतूक विभागाने मागील १५ दिवसात रेकॉर्ड ब्रेक कारवाई केली. सरासरी दिवसाला ८२९ वाहनचालकांवर कारवाई करीत ३२ लाख ४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. २०११ पासून प्रथमच एवढ्या व्यापक स्वरूपात कारवाई झाल्याचे दिसते. वाहतूक पोलिसांनी दिवसाला सरासरी दोन लाख १३ हजार ६०६ रुपयांचा दंड वसूल केला.
वाहतूक पोलिसांनी मागील महिन्यातच चार विभागीय कार्यालये सुरू झाली असून, त्याचा परिणाम दिसू लागला आहे. मागील १५ दिवसात तर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच दणका दिला. पंधरवाड्यात दोन वेळा केलेल्या सरप्राईज चेकिंगसह उर्वरित १३ दिवस बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहिली. साधारणतः इतर वेळी वाहतूक शाखेकडून दररोज ३०० च्या दरम्यान केसेस केल्या जातात. मात्र, तेच या १५ दिवसात वाहतूक पोलिसांनी सरासरी ८२९ वाहनचालकांना दणका दिला. तब्बल १२ हजार ४४७ वाहनचालकांकडून पोलिसांनी ३२ लाख चार हजार १०० रुपये दंड वसूल केला. २०११ पासून कारवाईचा हा उच्चांक ठरला आहे. वाहतूक पोलिसांनी ८ जुलै पर्यंत ६१ हजार १०६ वाहनचालकांवर विविध कारणांमुळे कारवाई करीत एक कोटी ४९ लाख ३६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला होता.
९ जुलैपासून वाहतूक शाखेने अचानक कारवाईला गती दिली. ९ जुलै ते २३ जुलैपर्यंत या कालावधीत एकूण कारवाईचा आकडा थेट ७३ हजार ५६३ च्या घरात पोहचला. तर, कारवाईमुळे वाहतूक शाखेने एक कोटी ८१ लाख ४० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.
बेशिस्त वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी याशिवाय पर्याय नाही. वर्षाच्या सुरुवातीचे पाच ते सहा महिने वेगवेगळ्या पध्दतीने समाज प्रबोधन करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. नियम पाळण्याऐवजी वाहनचालकांना दंड भरणे सोपे वाटत असेल तर पोलिसही आपले काम करीतच राहतील. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली असून, भ्रष्टाचार होण्याच्या सर्व शक्यता पडताळून त्यानुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत. तरीही काही तक्रारी असतील तर नागरिकांनी त्या मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
वाहतूक विभागाने मागील १५ दिवसात रेकॉर्ड ब्रेक कारवाई केली. सरासरी दिवसाला ८२९ वाहनचालकांवर कारवाई करीत ३२ लाख ४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. २०११ पासून प्रथमच एवढ्या व्यापक स्वरूपात कारवाई झाल्याचे दिसते. वाहतूक पोलिसांनी दिवसाला सरासरी दोन लाख १३ हजार ६०६ रुपयांचा दंड वसूल केला.
वाहतूक पोलिसांनी मागील महिन्यातच चार विभागीय कार्यालये सुरू झाली असून, त्याचा परिणाम दिसू लागला आहे. मागील १५ दिवसात तर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच दणका दिला. पंधरवाड्यात दोन वेळा केलेल्या सरप्राईज चेकिंगसह उर्वरित १३ दिवस बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहिली. साधारणतः इतर वेळी वाहतूक शाखेकडून दररोज ३०० च्या दरम्यान केसेस केल्या जातात. मात्र, तेच या १५ दिवसात वाहतूक पोलिसांनी सरासरी ८२९ वाहनचालकांना दणका दिला. तब्बल १२ हजार ४४७ वाहनचालकांकडून पोलिसांनी ३२ लाख चार हजार १०० रुपये दंड वसूल केला. २०११ पासून कारवाईचा हा उच्चांक ठरला आहे. वाहतूक पोलिसांनी ८ जुलै पर्यंत ६१ हजार १०६ वाहनचालकांवर विविध कारणांमुळे कारवाई करीत एक कोटी ४९ लाख ३६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला होता.
९ जुलैपासून वाहतूक शाखेने अचानक कारवाईला गती दिली. ९ जुलै ते २३ जुलैपर्यंत या कालावधीत एकूण कारवाईचा आकडा थेट ७३ हजार ५६३ च्या घरात पोहचला. तर, कारवाईमुळे वाहतूक शाखेने एक कोटी ८१ लाख ४० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.
बेशिस्त वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी याशिवाय पर्याय नाही. वर्षाच्या सुरुवातीचे पाच ते सहा महिने वेगवेगळ्या पध्दतीने समाज प्रबोधन करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. नियम पाळण्याऐवजी वाहनचालकांना दंड भरणे सोपे वाटत असेल तर पोलिसही आपले काम करीतच राहतील. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली असून, भ्रष्टाचार होण्याच्या सर्व शक्यता पडताळून त्यानुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत. तरीही काही तक्रारी असतील तर नागरिकांनी त्या मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.