म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नियमीत सुरू करण्यात आला आहे. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सोमवारी (दि.३) महाराष्ट्र टाइम्सने ‘धरण भरले, मात्र पाणी दिवसाआड’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला.
नगराध्यक्षा धारणे यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. त्याच दिवशी हे वृत्त प्रकाशित झाल्याने त्यांनी दखल घेत नागरिकाना पाणीटंचाईतून मुक्त केले.
पावसाळा सुरू झाला तरीही त्र्यंबक परिसराकडे यंदा पावसाने सुरुवातीला पाठ फिरवली होती. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे शहरालगतचे अहिल्या धरण भरले तरीही शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे धारणे यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला आणि नियमीत पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या.
दरम्यान, शहरालगतचे ओव्होरफ्लो झालेल्या आहिल्या धरणाचे जलपूजन नगराध्यक्षा तृप्ती धारणे आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी केले. त्र्यंबक शहराच्या काही भागास या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. ब्राह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या या धरणात पर्वतराईतून खळाळणारे धबधब्यांचे पाणी जमा होते. त्यामुळे हे धरण लवकर भरते. जलपूजन प्रसंगी नगराध्यक्षा धारणे यांच्या समवेत गटनेते योगेश तुंगार, गटनेते रवींद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव, ललीत लोहगावकर, यशोदा अडसरे, अलका शिरसाठ, अंजनाबाई कडलग, सिंधुबाई मधे उपस्थित होते.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नियमीत सुरू करण्यात आला आहे. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सोमवारी (दि.३) महाराष्ट्र टाइम्सने ‘धरण भरले, मात्र पाणी दिवसाआड’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला.
नगराध्यक्षा धारणे यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. त्याच दिवशी हे वृत्त प्रकाशित झाल्याने त्यांनी दखल घेत नागरिकाना पाणीटंचाईतून मुक्त केले.
पावसाळा सुरू झाला तरीही त्र्यंबक परिसराकडे यंदा पावसाने सुरुवातीला पाठ फिरवली होती. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे शहरालगतचे अहिल्या धरण भरले तरीही शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे धारणे यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला आणि नियमीत पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या.
दरम्यान, शहरालगतचे ओव्होरफ्लो झालेल्या आहिल्या धरणाचे जलपूजन नगराध्यक्षा तृप्ती धारणे आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी केले. त्र्यंबक शहराच्या काही भागास या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. ब्राह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या या धरणात पर्वतराईतून खळाळणारे धबधब्यांचे पाणी जमा होते. त्यामुळे हे धरण लवकर भरते. जलपूजन प्रसंगी नगराध्यक्षा धारणे यांच्या समवेत गटनेते योगेश तुंगार, गटनेते रवींद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव, ललीत लोहगावकर, यशोदा अडसरे, अलका शिरसाठ, अंजनाबाई कडलग, सिंधुबाई मधे उपस्थित होते.