म. टा. वृत्तसेवा, सटाणा
तालुक्यातील वीरगावपाडे (ता. बागलाण) येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थ्यांचा मंगळवारी दुपारी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सतीश रंजन बागूल (९, रा. मळगाव, ता. बागलाण) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. याच आश्रमशाळेतील दोन मुले जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन-तीन दिवसांपासून दोन्ही विद्यार्थ्यांना ताप, खोकला, उलट्यांचा त्रास होत होता. वास्तविक या विद्यार्थ्यांना तत्काळ औषोधोपचार करणे आवश्यक होते. मात्र, आश्रमशाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप आहे. अखेर सतीश बागूलसह अंकुश सोनवणे व सोपान भोये यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी आणण्यात आले.
या विद्यार्थ्यांना अधीक्षक डी. एस. सोनार यांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच खालावल्याने विद्यार्थ्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सतीशचा मृत्यू झाला.
पालकांचा संताप
वीरगावपाडे येथील आश्रमशाळेत अन्य १५ ते २० विद्यार्थांनाही असाच त्रास होत आहे. या आश्रमशाळेत एकूण ३५७ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एस. एस. कापडणीस, शिक्षण विस्तार अधिकारी कळवण प्रकल्प मुसळे आदींसह पालक शाळेत उपस्थित होते. संतप्त पालकांनी संपूर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली.
तालुक्यातील वीरगावपाडे (ता. बागलाण) येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थ्यांचा मंगळवारी दुपारी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सतीश रंजन बागूल (९, रा. मळगाव, ता. बागलाण) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. याच आश्रमशाळेतील दोन मुले जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन-तीन दिवसांपासून दोन्ही विद्यार्थ्यांना ताप, खोकला, उलट्यांचा त्रास होत होता. वास्तविक या विद्यार्थ्यांना तत्काळ औषोधोपचार करणे आवश्यक होते. मात्र, आश्रमशाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप आहे. अखेर सतीश बागूलसह अंकुश सोनवणे व सोपान भोये यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी आणण्यात आले.
या विद्यार्थ्यांना अधीक्षक डी. एस. सोनार यांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच खालावल्याने विद्यार्थ्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सतीशचा मृत्यू झाला.
पालकांचा संताप
वीरगावपाडे येथील आश्रमशाळेत अन्य १५ ते २० विद्यार्थांनाही असाच त्रास होत आहे. या आश्रमशाळेत एकूण ३५७ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एस. एस. कापडणीस, शिक्षण विस्तार अधिकारी कळवण प्रकल्प मुसळे आदींसह पालक शाळेत उपस्थित होते. संतप्त पालकांनी संपूर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली.