त्र्यंबकेश्वर शिवारात पावसाने नुकसान; बळीराजाच्या चिंतेत वाढ
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
नाशिक शहरासह जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्र्यंबकेश्वरला पाऊस सुरूच असल्याने भाताच्या पिकाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हे सकाळी पावसाच्या गैरहजेरीत जमेल तसे भाताच्या कापण्या करून घेताना दिसत आहेत. जेणेकरून पावसाच्या येण्याअगोदर पिकाचे नुकसान होणार नाही.
त्र्यंबकेश्वरला शेतकरी हे सकाळी सहसा पाऊस नसल्याने उन्हाची ताप मिळते तेव्हा भात कापणी करून शेताच्या बांधावर जागा मिळेल तेथे ताडपत्री टाकून भात झोडून घेत आहेत. तसेच त्याला तयार करून तेथेच सुपाने उफणणी करून दुपारनंतर आकाश काळोखाच्या अगोदर घराची वाट धरताना दिसत आहेत. आता दिवाळीच्या शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने शेतकऱ्यांची मुले-मुली त्यांना मदत करीत आहेत.
शेतकरी जमेल तसा कापणी हंगामास सामोरा जात असून, शेत शिवारातील चित्र अत्यंत धक्कादायक असे आहे. शेतकऱ्यांचा भात पिकासाठी आतापर्यंत पेरणी पूर्व मशागतीपासून आवणी आणि निंदणीवर मोठा खर्च झालेला आहे. असे असताना हाती रोकड नसलेला शेतकरी सततच्या पावसाने अत्यंत हातघाईला आलेला आहे. भात पीक पावसाने भिजत असल्याने धावपळ करीत त्याला तातडीने तयार करून विकून पैसे मोकळे करण्याच्या प्रयत्नात आहे. पावसाने पीक खराब होण्यापेक्षा ते घरात आणून मालाला बाजारात चांगला भाव मिळणार नाही, ही चिंताही त्याला सतावत आहे. नागली, वरई यांची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. सरकार यंत्रणांना लोकप्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत.
मात्र गतवर्षी पेरणी झाल्यानंतर झालेल्या नुकसानींचे पंचनामे झाले पण त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने त्रस्त झालेला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वळवाच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने भात पीक संकटात आले आहे. त्र्यंबक परिसरातील कापणी झालेले भाताचे पीक आता खराब झाले असून, त्यासाठी शेतकरी चिंतेत आहे. त्याचबरोबर त्यांच्या शिवारात उभे असलेले भाताचीदेखील प्रतवारी घटण्याची शक्यता वाढली आहे. या भीतीने शेतकरी आता आपापल्या भातपीकाच्या कापणीसाठी सरसावला आहे. भाताला अगोदरच उत्पादन मूल्यापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यात आता सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजाच्या अडचणी वाढवल्या आहेत.
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
नाशिक शहरासह जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्र्यंबकेश्वरला पाऊस सुरूच असल्याने भाताच्या पिकाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हे सकाळी पावसाच्या गैरहजेरीत जमेल तसे भाताच्या कापण्या करून घेताना दिसत आहेत. जेणेकरून पावसाच्या येण्याअगोदर पिकाचे नुकसान होणार नाही.
त्र्यंबकेश्वरला शेतकरी हे सकाळी सहसा पाऊस नसल्याने उन्हाची ताप मिळते तेव्हा भात कापणी करून शेताच्या बांधावर जागा मिळेल तेथे ताडपत्री टाकून भात झोडून घेत आहेत. तसेच त्याला तयार करून तेथेच सुपाने उफणणी करून दुपारनंतर आकाश काळोखाच्या अगोदर घराची वाट धरताना दिसत आहेत. आता दिवाळीच्या शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने शेतकऱ्यांची मुले-मुली त्यांना मदत करीत आहेत.
शेतकरी जमेल तसा कापणी हंगामास सामोरा जात असून, शेत शिवारातील चित्र अत्यंत धक्कादायक असे आहे. शेतकऱ्यांचा भात पिकासाठी आतापर्यंत पेरणी पूर्व मशागतीपासून आवणी आणि निंदणीवर मोठा खर्च झालेला आहे. असे असताना हाती रोकड नसलेला शेतकरी सततच्या पावसाने अत्यंत हातघाईला आलेला आहे. भात पीक पावसाने भिजत असल्याने धावपळ करीत त्याला तातडीने तयार करून विकून पैसे मोकळे करण्याच्या प्रयत्नात आहे. पावसाने पीक खराब होण्यापेक्षा ते घरात आणून मालाला बाजारात चांगला भाव मिळणार नाही, ही चिंताही त्याला सतावत आहे. नागली, वरई यांची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. सरकार यंत्रणांना लोकप्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत.
मात्र गतवर्षी पेरणी झाल्यानंतर झालेल्या नुकसानींचे पंचनामे झाले पण त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने त्रस्त झालेला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वळवाच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने भात पीक संकटात आले आहे. त्र्यंबक परिसरातील कापणी झालेले भाताचे पीक आता खराब झाले असून, त्यासाठी शेतकरी चिंतेत आहे. त्याचबरोबर त्यांच्या शिवारात उभे असलेले भाताचीदेखील प्रतवारी घटण्याची शक्यता वाढली आहे. या भीतीने शेतकरी आता आपापल्या भातपीकाच्या कापणीसाठी सरसावला आहे. भाताला अगोदरच उत्पादन मूल्यापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यात आता सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजाच्या अडचणी वाढवल्या आहेत.