म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मनमाड-मालेगाव महामार्गावरील जळगाव चोंडी शिवारात आगपेट्यानी भरलेल्या ट्रकला रविवारी (दि. १७) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात ट्रकसह २१ टन आगपेट्या जळून खाक झाल्या. आगीत ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी ट्रकसह आग विझविण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिलनाडूकडून राजस्थानमधील जयपूर येथे जात असलेला ट्रक (टीएन ३४ डब्ल्यू ४७८६) रविवारी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मनमाड-मालेगाव महामार्गावरील जळगाव चोंडी शिवारात आला. ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकच्या पाठीमागून धूर येत असल्याचे समजताच ट्रकचालकाने गाडी थांबविली. तो खाली उतरून पाठीमागे जाईपर्यंत अवघ्या काही मिनिटात संपूर्ण ट्रकला आग लागली. यात ट्रकसह २१ टन आगपेट्या जळून खाक झाल्या. आगीने परिसरात सर्वत्र धूर पसरला. घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. आग विझवण्यात यश आले. मात्र, २० लाख रुपयांचा ट्रक व १८ लाख रुपयांच्या आगपेट्या आगीत भक्ष्यस्थानी पडून तब्बल ३८ लाखांचे नुकसान झाले.
आगीचे कारण गुलदस्त्यात
ट्रकला आग लागल्याचे वृत्त पसरताच परिसरातील लोकांनी आग पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. काही जणांनी तर जळलेले आगपेट्यांचे बॉक्स घेऊन धूम ठोकली. दरम्यान, ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. आग विझविण्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
मनमाड-मालेगाव महामार्गावरील जळगाव चोंडी शिवारात आगपेट्यानी भरलेल्या ट्रकला रविवारी (दि. १७) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात ट्रकसह २१ टन आगपेट्या जळून खाक झाल्या. आगीत ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी ट्रकसह आग विझविण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिलनाडूकडून राजस्थानमधील जयपूर येथे जात असलेला ट्रक (टीएन ३४ डब्ल्यू ४७८६) रविवारी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मनमाड-मालेगाव महामार्गावरील जळगाव चोंडी शिवारात आला. ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकच्या पाठीमागून धूर येत असल्याचे समजताच ट्रकचालकाने गाडी थांबविली. तो खाली उतरून पाठीमागे जाईपर्यंत अवघ्या काही मिनिटात संपूर्ण ट्रकला आग लागली. यात ट्रकसह २१ टन आगपेट्या जळून खाक झाल्या. आगीने परिसरात सर्वत्र धूर पसरला. घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. आग विझवण्यात यश आले. मात्र, २० लाख रुपयांचा ट्रक व १८ लाख रुपयांच्या आगपेट्या आगीत भक्ष्यस्थानी पडून तब्बल ३८ लाखांचे नुकसान झाले.
आगीचे कारण गुलदस्त्यात
ट्रकला आग लागल्याचे वृत्त पसरताच परिसरातील लोकांनी आग पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. काही जणांनी तर जळलेले आगपेट्यांचे बॉक्स घेऊन धूम ठोकली. दरम्यान, ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. आग विझविण्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.