नाशिक :
जिल्ह्यात बागलाण आणि येवला तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. या घटनांची जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली असून, जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८१ झाली आहे.
बागलाण तालुक्यातील महड येथे प्रशांत दादाजी सोनवणे (वय २५) या शेतकऱ्याने १० ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सोमवारी (दि.१५) प्राप्त झाला. प्रशांत याच्या आईच्या नावे शेती आहे. त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि मुलीचा समावेश आहे.
दुसरी घटना येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथे आज घडली. विठ्ठल दगू राजुळे (वय ५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या दोन्ही घटनांत संबंधित शेतकरी कुटुंबावर काही कर्ज होते का, बँकेचा तगादा, नापिकी यामुळे त्यांनी आत्महत्या केली की अन्य कारणाने, याची माहिती घेण्याचे काम स्थानिक प्रशासनाने सुरू केले आहे.
जिल्ह्यात बागलाण आणि येवला तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. या घटनांची जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली असून, जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८१ झाली आहे.
बागलाण तालुक्यातील महड येथे प्रशांत दादाजी सोनवणे (वय २५) या शेतकऱ्याने १० ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सोमवारी (दि.१५) प्राप्त झाला. प्रशांत याच्या आईच्या नावे शेती आहे. त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि मुलीचा समावेश आहे.
दुसरी घटना येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथे आज घडली. विठ्ठल दगू राजुळे (वय ५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या दोन्ही घटनांत संबंधित शेतकरी कुटुंबावर काही कर्ज होते का, बँकेचा तगादा, नापिकी यामुळे त्यांनी आत्महत्या केली की अन्य कारणाने, याची माहिती घेण्याचे काम स्थानिक प्रशासनाने सुरू केले आहे.