अ‍ॅपशहर

दोन विवाहितांचा मृत्यू

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला.

Maharashtra Times 27 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two womens death after drowning
दोन विवाहितांचा मृत्यू


विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला. नांदगाव तालुक्यातील चांदोरा व खिरडी येथे या घटना घडल्या. चांदोरा येथील विवाहिता शशिकला मच्छिंद्र चव्हाण (वय ४२) शेतातील विहिरीत पाणी काढत असताना त्या पाय घसरून पडल्या. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. खिरडी येथील मनीषा विजय पठाडे (वय २२) पहाटे पाच वाजता शेतातील पाणी काढत असताना विहिरीत पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज