मटा ऑनलाइन वृत्त । मालेगाव
सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे त्रस्त झालेल्या दोन तरूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. राकेश प्रकाश शेवाळे आणि मनोज शांताराम सावंत अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहे.
मालेगाव तालुक्यातील निंबळके गावातील २४ वर्षीय राकेश शेवाळे याने कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून गळफास घेत आत्महत्त्या केली. राकेशवर विविध कार्यकारी सोसायटीचे साठ हजार कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २५ वर्षीय मनोज सावंत या शेतकऱ्याने शेततळ्यातच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. अवघ्या बारा तासाच्या आत तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव आदी मागण्यांसाठी विरोधकांची संघर्ष यात्रा सुरू असून आज ही संघर्ष यात्रा मालेगाव येथे पोहचली आहे. आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचं विरोधी पक्ष नेत्यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे त्रस्त झालेल्या दोन तरूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. राकेश प्रकाश शेवाळे आणि मनोज शांताराम सावंत अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहे.
मालेगाव तालुक्यातील निंबळके गावातील २४ वर्षीय राकेश शेवाळे याने कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून गळफास घेत आत्महत्त्या केली. राकेशवर विविध कार्यकारी सोसायटीचे साठ हजार कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २५ वर्षीय मनोज सावंत या शेतकऱ्याने शेततळ्यातच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. अवघ्या बारा तासाच्या आत तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव आदी मागण्यांसाठी विरोधकांची संघर्ष यात्रा सुरू असून आज ही संघर्ष यात्रा मालेगाव येथे पोहचली आहे. आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचं विरोधी पक्ष नेत्यांनी भेट घेऊन सांत्वन केले.