अ‍ॅपशहर

विज्ञानावर आधारित शेती करणे गरजेचे

परदेशातील अत्याधुनिक शेती विरूद्व भारतातील परंपरागत जिरायती शेती असे युद्ध आहे. महात्मा फुलेंनी दिलेला विज्ञानावर आधारित शेतीचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे परखड मत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 24 Jul 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uttam kamble speak on india farm at pimpalgaon
विज्ञानावर आधारित शेती करणे गरजेचे


परदेशातील प्रक्रिया उद्योगासह वीज, पाणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नटलेली शेती विरूद्व भारतातील परंपरागत जिरायती शेती असे युद्ध आहे. खडतर शेतीचा प्रवास करणारा आपला शेतकरी निराशेतून आत्महत्या करीत आहे. मात्र महात्मा फुलेंनी दिलेला विज्ञानावर आधारित शेतीचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

ओझर कॅनॉल बागार्इतदार संघाच्या वतीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात कांबळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील होते. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, यशवंत हप्पे, दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, उत्तम भालेराव, चांगेदव होळकर, प्रतापराव मोरे, दिलीप पाटील अंबादास बनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, निव्वळ कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. आत्महत्येचे कारण कर्जापलीकडचे आहे. शेतकरी विज्ञानाकडे पाठ फिरवतो. विज्ञान वापरायला वेळ लागल्यामुळे शेतकरी जगापेक्षा शंभर वर्षांनी मागे आहे. त्यामुळे केवळ मरणाने प्रश्न सुटणार नाही, तर मरणाकडे पाठ फिरवून लढायला शिकले पाहिजे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नाळ सामान्य माणसाशी जोडली गेली होती. ज्ञानाचे डोळे मिळावे म्हणून त्यांनी आयुष्य खर्च केले. विनाअनुदानित शिक्षण संस्था ही वसंतदादा पाटील यांचीच संकल्पना. कर्मवीर काकासाहेब वाघ, तात्यासाहेब बोरस्ते यांनी सहकार शिक्षणाचा पाया रचला. त्यामुळेच सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची शक्ती त्यांच्या विचारात असल्याचे गौरवोद्गार कांबळे यांनी काढले. नीलीमा पवार, कर्मवीर काकासाहेब, तात्यासाहेब यांचा गौरवशाली इतिहास असून, सहकार शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती केली. त्यांचा वारसा जपणे, त्यांच्या विचाराने काम करणे हे आपले कर्तव्य आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज